twitter
rss

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣1⃣3⃣

*👵🏻आजीबाईंची शाळा आता कॅनडात*

Maharashtra Times |Nov 27, 2017

साभार- म. टा.प्रतिनिधी, ठाणे

वयोवृद्ध महिलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुरबाडच्या फांगणे गावात सुरू झालेल्या आजीबाईच्या शाळा आता थेट कॅनडा येथे भरणार आहे. ही संकल्पना राबवणारे शिक्षक योगेंद्र बांगर यांना थेट कॅनडामध्ये येण्याचे निमंत्रणही तेथील लूसिन्ट क्याय कन्सल्टिंग या संस्थेचे जान पेझार्रो यांनी धाडले आहे.
गेल्यावर्षी महिला दिनाचे औचित्य साधत मुरबाड तालुक्यात आजीबाईंच्या शाळेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती. चूल आणि मूल या रहाटगाड्यात अडकलेल्या आणि आयुष्य अशिक्षितपणात घालवणाऱ्या महिलांना किमान अक्षरओळख व्हावी, यासाठी मोतीराम गणपतदादा चॅरिटेबल ट्रस्ट आणि जिल्हा परिषदेच्या सहकार्याने ही शाळा सुरू झाली होती. शाळेत ६० ते ९० वर्षे वयोगटातील २८ आजी शिक्षणासाठी येतात. दररोज दुपारी २ ते ४ या वेळेत ही शाळा भरते. अल्पावधीतच हा उपक्रम देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांनी गावात दाखल होत आजीबाईंची शाळा घराघरांत पोहोचवली. योगेंद्र बांगर यांच्या प्रयत्नातून उभ्या राहिलेल्या या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले आणि मदतीचा हातही पुढे केला होता. अनेक परदेशी पाहुणे या शाळेत येत असतात. कॅनडा येथील लूसिन्ट क्याय कन्सल्टिंग या सामाजिक संस्थेला त्याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांचे प्रतिनिधी इथे दाखल झाले होते.

शाळेची वेळ, अभ्यासक्रमाची रचना, शाळेचे गावापासूनचे अंतर, शाळेत आजीबाईंना सामावून घेण्याची प्रक्रिया, शिक्षण साहित्य याविषयीची माहिती संस्थेने सुरुवातीला संकलित केली होती. त्यानंतर शाळेच्या या अभिनव उपक्रमाला कॅनडामध्ये विशेष पसंती मिळत असून तिथल्या ग्रामीण भागामधील रहिवाशांसाठी विशेषतः ज्येष्ठांसाठी हा उपक्रम राबवण्याचा मानस संस्थेने व्यक्त केला आहे. या उपक्रमाचे जागतिक स्तरावर कौतुक होत असल्याने योगेंद्र बांगर यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे.

📚📕📗📘📙📔📒📚

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣1⃣2⃣

*शिक्षणासाठी बंड पुकारत सुनीताने रोखला स्वत:चा बालविवाह*

साभार - श्रीकांत बंगाळे आणि अमेय पाठक

*बीबीसी मराठी,14 नोव्हेंबर 2017*

जेमतेम 12-13व्या वर्षी सुनिताला लग्न करायचं नव्हतं. तिला शिकायचं होतं. सरकारी अधिकारी व्हायचं होतं.
सुनीता देविदास उबाळे ही जालना जिल्ह्यातल्या नंदापूर इथं राहते. सातवीत असतानाच सुनीताच्या घरच्यांनी तिचं लग्न ठरवलं. लग्न ठरवताना ना तिला त्याची कल्पना देण्यात आली, ना तिची मर्जी विचारात घेण्यात आली.
त्यामुळे मुलगा कोण आहे, कसा आहे, काय करतो, याबद्दल तिला काहीही माहीत नव्हतं. काही दिवसातच नातेवाईकांच्या दबावाखाली सुनिताच्या आई-वडिलांनी तिचा साखरपुडाही उरकला.
जेमतेम 12-13व्या वर्षी सुनिताला लग्न करायचं नव्हतं. तिला शिकायचं होतं. सरकारी अधिकारी व्हायचं होतं.
सुनीताने सर्वप्रथम घरच्यांना आणि नातेवाईंकांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्यात यश मिळत नाही हे लक्षात आल्यावर ती शाळेतल्या तिच्या शिक्षकाकडे गेली आणि त्यांना लग्नाबद्दल सांगितलं.
त्या वेळी काही दिवसांपूर्वीच जालना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सुनीताच्या शाळेत जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचं आयोजन केलं होतं. स्पर्धेनंतर शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शाळेतल्या शिक्षकांना त्यांचा मोबाईल क्रमांक दिला होता.

मग सुनीताने शाळेतल्या शिक्षकाकडून जालन्याचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी राधाकृष्णन यांना फोन लावला. "इच्छा नसतानाही माझं लहान वयात लग्न करून दिलं जात आहे," असं तिनं फोनवरून त्यांना कळवलं.

त्यांनीही वेळ न घालवता 'सर्व शिक्षा अभियाना'साठी काम करत असलेल्या टीमला सुनीताच्या गावी पाठवलं. अठरा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीचं लग्न करणं कायद्यानं कसं अयोग्य आहे, त्याचे काय परिणाम होतात, हे या टीमनं सुनीताच्या पालकांना समजावून सांगितलं.
मग सुनीताच्या पालकांनीही आपला निर्णय मागे घेतला. आणि सुनिताला पुढे शिकायची संधी मिळाली.

*पण लग्न का करणार होते?*

सुनीताचे वडील देविदास उबाळे यांना पाच अपत्य आहेत - तीन मुली आणि दोन मुलं. घरी फक्त दीड एकर शेती. तीही कोरडवाहू.
पहिल्या दोन मुलींची लग्न करताना त्यांचं कबरडं मोडलं होतं.

त्यांनी सांगितलं, "पोरीला शिकवायला मही 10 रुपयाची ऐपत नव्हती. शेतात काही माल होत नाही. मग काय करणार होतो तिला घरी ठेवून?"
अठरा वर्षांखालील मुलीचं आणि 21 वर्षांखालील मुलाचं लग्न कायद्याने करणं गुन्हा आहे, हे समजल्यावर आपण चुकत आहोत, याची जाणीव त्यांना झाली.

"आता पोरगी स्वत:हून शिकत आहे. जोवर तिला शिकायचं आहे, तोवर ती शिकेल. जोवर तिची शिकायची इच्छा संपत नाही, तोवर तिच्या लग्नाचा विषय काढणार नाही," असं त्यांनी पुढे सांगितलं.

*बालविवाह थांबवण्याचा इम्पॅक्ट*

बालविवाह थांबल्यानंतर सुनीता सर्व शिक्षा अभियानातील कर्मचाऱ्यांसोबत गावोगावी जाऊन बालविवाहाबद्दल जनजागृती करू लागली.
"माझ्या आई-वडिलांनी माझं लग्न लहान वयात ठरवलं होतं. पण तुम्ही तसं करू नका. जसं माझ्यासोबत झालं, तसं तुमच्या मुलींसोबत करू नका," असं ती गावोगावच्या महिलांना सांगून त्यांच्या मुलींचा बालविवाह न करण्यासाठी प्रवृत्त करू लागली.

*महिलाही तिची कहाणी ऐकून प्रेरित होतात.*

"आम्ही आमच्या मुलीचं लवकर लग्न करणार नाही. कारण तुझं ऐकल्यापासून आम्हाला समजलं की, मुलगी पण अधिकारी बनू शकते. मुलगी पण कोणत्याही क्षेत्रामध्ये कमी नाही," असं त्या महिला सुनीताला सांगतात.

*मुख्य कार्यकारी अधिकारी व्हायचं स्वप्न*

सुनीता सातवीपर्यंत गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकली. आठवीत तिला केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत बदनापूरच्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात प्रवेश मिळाला.
दहावीपर्यंतचं शिक्षण तिनं तिथंच पूर्ण केलं. नंतर मात्र कॉलेजच्या शिक्षणाचा खर्च परवडत नसल्यानं तिला पुन्हा गावाकडं परतावं लागलं.

सुनीताला मुख्य कार्यकारी अधिकारी व्हायचं आहे.
आज ती गावातल्या शाळेत बारावीत शिकत आहे. इतकी सगळी उठाठेव झाली पण तिचं ध्येय कायम आहे.
"मी लहानपणी लग्न केलं नाही, कारण मला शिकायचं होतं. कितीही अडचणी आल्या तरी मी शिक्षण सोडणार नाही. कारण मला मुख्य कार्यकारी अधिकारी व्हायचं आहे."

*जबरदस्तीविरोधात आवाज उठवा!*

आपल्यावर घडलेल्या प्रसंगातून सुनीता ना केवळ स्वत: सावध आहे, ती समाजात एक सावधतेचा संदेश पसरवत आहे.
"मुलींनो, तुमच्या स्वत:मध्ये हिंमत असायला पाहिजे. घरच्यांनी लग्नासाठी जास्त जबरदस्ती केली, तर त्या विरुद्ध बोलायची तुमच्यामध्ये हिंमत असायला पाहिजे."
कारण मुलीने जर ठामपणे नकार दिला, तर आई-वडीलच काय, कोणीच काही करू शकत नाही."

📚📕📗📘📙📔📒📚

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_