twitter
rss

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣8⃣7⃣

*🌀जैद बारस्करचा प्रामाणिकपणा...*

_*जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्याने परत केले सापडलेले २८००० रुपये*_

गुरुवर्य न्यूज,कवठेमहांकाळ.
दि.१४/०३/२०१९

      नागज :-    आज पैशाच्‍या  मागे सर्वजण धावताना दिसतात. केवळ शेपाचशे रुपयांसाठी समाजात भांडणे लागल्‍याचे आपण पाहिले आहे. पण अठ्ठावीस हजार रुपयांची रक्कम सापडूनही परत करण्याचे औदार्य नागज येथील शाळकरी विद्यार्थ्याने दाखवले आहे.
   ज्या वयात पैशासाठी हठ्ठ करायचा त्या वयात मोठी रक्कम सापडूनही ती रक्कम प्रामाणिकपणे परत जैदने परत केली आहे. स्वार्थी बनत चाललेल्या समाजात पैशांपेक्षाही प्रामाणिकपणा महत्वाचा असल्याचे या जिल्हा परिषद शाळेतील मुलाने सिद्ध केल्याने त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
       जैद जहिर बारस्कर हा विद्यार्थी नागज येथिल जिल्हा परिषदेच्या उर्दू माध्यमाच्या शाळेत शिकत आहे, उन्हाळ्याचे दिवस असल्याने शाळा सकाळ सत्रात सुरु आहे.
    काल संध्याकाळी ५ वाजता जैद  नमाजला मशीदीमध्ये जात होता. या मशीद जवळ हाजी मुन्ना तांबोळी यांचे बांगड्यांचे दुकान आहे. या दुकानाजवळ जैद आला असताना त्याला रस्त्यावर पैशांचे पुडके पडलेले दिसले. काही  क्षणासाठी तो थोडा घाबरला पण त्याने ते पैसे उचलले आणि त्या शेजारच्या दुकानातील मुन्ना तांबोळी यांना ते पैसे दिले. मुन्ना तांबोळी आणि गावकऱ्यांनी  पैशाबद्दल चौकशी केली असता नागज गावात डाळींब आणि चिकू खरेदीसाठी नांदेड ,सोलापूर येथिल व्यापारी लोकं आले आहेत, ते व्यापारी नमाजला जाताना एका व्यापाऱ्याचे पैसे पडल्याचे समजले... पूर्ण चौकशी करून त्या व्यापाऱ्याला ते २८००० रुपये देण्यात आले.त्या व्यापाऱ्याने प्रामाणिकपणा दाखवल्याबद्दल जैदला ५०० रु बक्षीस म्हणून दिले...

आज शाळेमध्ये जैदचे त्याचे वर्गशिक्षक जुबेर पटेल आणि सर्व मित्रांनी अभिनंदन केले ,जैदच्या प्रामाणिकपणाचे संपूर्ण कवठेमहांकाळ तालुक्यात कौतुक होत आहे, खरोखरचं जैद बारस्कर याने कसलीही लालसा न दाखवता प्रामाणिकपण पैसेे परत करुन समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला आहे.
    जैद तुला गुरुवर्य ग्रुपचा सलाम...

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣8⃣5⃣

*👩🏻Women’s Day 2019 – हमिदा खान: महाराष्ट्रातील ४०० हून अधिक गड- किल्ले सर करणारी ‘हिरकणी’*

*_२००० साली तर त्यांनी चक्क १५० गड किल्ल्यांना भेट दिली_*

साभार -लोकसत्ता ऑनलाइन | March 8, 2019 10:09 am

गड- किल्ले फिरणं ही एक धुंदी असते… आणि जो ती धुंदी अनुभवतो त्यालाच ती जाणवते. गड- किल्ले फिरल्यावर आपल्या समृद्ध इतिहासाबद्दल जास्त आपुलकी वाटू लागते. अशीच एक धुंदी जोपासत आहेत मुंबईत राहणाऱ्या हमिदा खान.
१९९० साली हमिदा यांनी युथ हॉस्टेल सोबत त्यांचा ट्रेकिंगचा प्रवास सुरु केला. शाळेत असल्यापासूनच महाराष्ट्राच्या इतिहासाविषयी त्यांना कुतूहल होतं आणि म्हणूनच त्यांनी गड- किल्ले भटकंतीला सुरुवात केली. पण त्यांच्या या प्रवासाची खरी सुरुवात झाली ती १९९९ साली. कारण तेव्हाच त्यांना गड- किल्ल्यांची माहिती गोळा करण्याचा ध्यास लागला. १९९९ साली त्यांच्या या प्रवासाला कलाटणी देण्याचे मुख्य कारण म्हणजे या एका वर्षात त्यांनी एकूण १०० गड किल्ल्यांना भेट देत त्या किल्ल्यांच्या माहितीचे संकलन केले. त्यांनी संकलित केलेल्या माहितीमध्ये गडाच्या इतिहासाबरोबरच गडाचे फोटो, तिथे जाणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक व गडावरील वास्तूंची नोंद अशा बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे.
१९९९ नंतर हमिदा यांनी गड- किल्ल्यांना भेट देण्याचा सपाटाच लावला. २००० साली तर त्यांनी चक्क १५० गड- किल्ल्यांना भेट दिली. २००१ साली आणखी शंभर गड- किल्ले त्यांनी सर केले. अशा रितीने अवघ्या ३ वर्षांमध्ये हमिदा यांनी महाराष्ट्रातील ३५० गड- किल्ले सर केले. विशेष म्हणजे त्या कधीच एका विशिष्ट ग्रुपसोबत या मोहिमांना जात नसत. जो ग्रुप ट्रेकिंगला जाणार असेल त्यांच्यासोबत त्या गड- किल्ल्यांवर जातात. अगदीच कोणी नसेल तर अनेकदा त्या एकट्याही प्रवास करत. त्यांच्या सोलो प्रवासाच्या आठवणी सांगताना त्या म्हणतात, ‘अनेक चांगले अनुभव मला या प्रवासात आले. पण काही प्रसंगी मला खडतर परिस्थितीला सामोरे जावे लागले आहे. बऱ्याचदा गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गावातील लोकांनाही गडाचं नावदेखील माहित नसायचं. मग गावातील पोलीस पाटील किंवा शाळेतून काही माहिती मिळतेय का हे पाहून मी गड सर करायचे.’
असाच एक प्रसंगाबद्दल बोलताना त्या म्हणतात, ‘एकदा भर पावसात निमगिरी किल्ल्यावर मी जात होते. किल्ल्यावर पोहचल्यावर तिथे कोणीच नव्हते म्हणून मी गडावरील मंदिरापाशी जाऊन बसले. तेव्हा अचानक एक गुराखी तिथे आला आणि माझ्याशी संवाद साधू लागला. काही वेळ गेल्यावर मला त्याच्या हालचाली काही बऱ्या वाटल्या नाहीत. म्हणून मी हातात एक मोठा दगड घेऊन त्या माणसाला अद्दल घडवायचं ठरवलं. माझं हे रूप पाहून तो तिथून पळून गेला.’ हमिदांच्या या २० वर्षातील गड- किल्ल्यांच्या प्रवासातील आणखीन एक वाईट अनुभव त्यांना नळदुर्गला जात असताना रात्रीच्या वेळी तुळजापूर मंदिरातील धर्मशाळेत त्यांना मुक्कामासाठी राहू दिले नव्हते तेव्हा आला. महिलांना तुळजापूर मंदिरातील धर्मशाळेत राहण्याची परवानगी नाही असं सांगून त्यांना नकार देण्यात आला होता. अशा प्रसंगांसंदर्भात बोलताना हमिदा म्हणतात, ‘मुलींनी एकटा प्रवास करताना जरा काळजी बाळगावी. एखादं धाडस करताना निसर्गाची साथ मिळते पण काही वेळा माणूसच माणसाला साथ देत नाही हे लक्षात घ्यायला हवे.’
आजवर हमिदा यांनी महाराष्ट्रातील ४०० हून अधिक गड- किल्ल्यांना भेट दिली आहे. २०१८ साली ७ जून रोजी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त हमिदा खान यांचा संभाजी राजे भोसले यांच्या हस्ते रायगडावर सत्कार करण्यात आला.
हमिदा यांनी महाराष्ट्रातील गड- किल्ल्यांबरोबरच राजस्थान, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, पंजाबसारख्या राज्यांमधील ऐतिहासिक पर्यटन स्थळांनाही भेट दिली आहे. वयाचं अर्धशतक गाठणाऱ्या हमिदा इथवरच थांबणार नाहीयेत. सामान्यांमध्ये फारसे परिचित नसलेले अजून बरेच गड- किल्ले त्यांना शोधून काढायचे आहेत. त्यांनी शोधलेला एक किल्ला म्हणजे बारड्याचा डोंगर म्हणून ओळखला जाणारा कारंजा किल्ला.
हमिदांचा गड- किल्ल्यांविषयीचा अभ्यास नक्कीच दांडगा आहे. म्हणूनच सध्या ट्रेकच्या नावावर जी पिकनिक चालू आहे त्याविषयी त्या नाराजी व्यक्त करतात. त्या म्हणतात, ‘दुर्गसंवर्धन करताना अनेकदा गडाच्या मूळ वास्तूंना डावलले जाते जे चुकीचे आहे. त्यामुळे संवर्धन नक्कीच करा पण काळजीपूर्वक आणि निसर्गाची साथ घेऊनच करा.’
गड- किल्ल्यांवर भटकंती करत त्यामाध्यमातून इतिहास संवर्धनाचा प्रयत्न करणाऱ्या हमिदा खान यांना जागतिक महिनादिनानिमित्त ‘गुरुवर्य ग्रुप’चा मानाचा मुजरा....

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

https://www.loksatta.com/maharashtra-news/womens-day-2019-hamida-khan-women-who-visited-400-forts-in-maharashtra-1854062/

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

यापूर्वीचे भाग वाचण्यासाठी आपल्या .....

http://guruvarykm.blogspot.in/     

या blog ला भेट द्या..

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣8⃣3⃣

*अभिनंदनची बिग फाईट!*

Published On: Mar 01 2019 1:33AM

_जमावाने घेरताच गोळीबार करत अभिनंदन धावत सुटले. थोडा वेळ मिळताच खिशातील कागदपत्रे गिळून नष्ट केली अन् मग झुंजत राहिले जमावाशी..._

*मुंबई : पुढारी वृत्तसेवा*

एखाद्या हॉलीवूड युद्धपटाच्या नायकाप्रमाणे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान चवताळलेल्या पाकिस्तानी तरुणांशी झुंजले. विमान कोसळल्यानंतर जखमी अवस्थेत असूनही, त्यांनी जे धाडस दाखविले, ते पाहून प्रत्येक भारतीयाच्या अंगावर रोमांच उभे राहतील. खिशात असलेली महत्त्वाची कागदपत्रे आणि नकाशे शत्रूच्या हाती लागू नयेत, म्हणून त्यांनी काही चक्‍क गिळून टाकली, तर काही पाण्यातून बुडवून नष्ट केली.

पाकिस्तानातील आघाडीचे वृत्तपत्र ‘डॉन’ने याबाबतचे वृत्त होरान गावच्या स्थानिक प्रत्यक्षदर्शीने कथन केलेल्या माहितीवरून प्रसिद्ध केले आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील होरान गावच्या आकाशात सकाळी पावणेनऊ वाजता आगीचे मोठे लोळ दिसले. त्यानंतर अभिनंदन पॅराशूटच्या मदतीने खाली उतरले. त्यांचे लँडिंग खूपच सफाईदार होते. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून हे ठिकाण सात कि. मी. अंतरावर आहे.

खाली उतरताच अभिनंदन यांनी स्थानिक तरुणांना हाक दिली आणि मी कुठे आहे; हा भारत आहे की पाकिस्तान, अशी विचारणा केली. त्यातल्या एका चालू तरुणाने ‘तू भारतातच आहेस’, असे सांगितले. ते ऐकताच अत्यानंद झालेल्या अभिनंदन यांनी भारतीय लष्कराच्या घोषणा दिल्या. भारतातील हे नेमके कोणते  ठिकाण आहे, असे त्यांनी विचारले असताना एका तरुणाने सांगितले, हे किलान आहे. तोपर्यंतही अभिनंदन यांना आपण पाकव्याप्त काश्मीरमध्ये असल्याचा अंदाज आलेला नव्हता.

माझी पाठ प्रचंड दुखत आहे, मला थोडे पाणी द्या, अशी विनंती त्यांनी  केली. मात्र, अभिनंदन यांनी दिलेल्या भारतीय घोषणांमुळे जमलेल्या तरुणांचा पोटशूळ उठला होता. त्यांनी अभिनंदन यांना पाणी तर दिले नाहीच, उलट ‘पाकिस्तान आर्मी झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या आणि तेव्हा कुठे आपण पाकिस्तानच्या हद्दीत आहोत, याची जाणीव अभिनंदन यांना झाली. त्यांनी कमरेचे पिस्तूल काढले आणि हवेत गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पाक तरुणांनी त्यांच्या दिशेने दगड भिरकावले.

हातात पिस्तूल घेऊन अभिनंदन सुमारे अर्धा किलोमीटर विरुद्ध दिशेने धावत राहिले. त्यांचा पाठलाग करणार्‍या तरुणांना घाबरवण्यासाठी अभिनंदन यांनी आणखी काही फैरी हवेत झाडल्या. याचदरम्यान ते एका पाण्याच्या डबक्याजवळ आले. तेथे थांबून त्यांनी खिशातली कागदपत्रे आणि नकाशे बाहेर काढली. काही कागदपत्रे त्यांनी गिळून टाकली आणि काही पाण्यात फेकून नष्ट केली.

तोपर्यंत पाठलाग करणारे तरुण त्यांच्याजवळ पोहोचले. त्यांनी अभिनंदन यांना त्यांच्याजवळचे पिस्तूल टाकून देण्यास बजावले. एकाने अभिनंदन यांच्या पायावर वार केला. इतरांनीही अभिनंदनना मारहाण करण्यास सुरुवात केली. काही जणांनी त्यांचे दोन्ही हात धरून त्यांना फरपटत नेले. या परिस्थितीतही अभिनंदन या तरुणांशी झटापट करत राहिले. तोपर्यंत पाक लष्कराचे सैनिक तेथे पोहोचले आणि त्यांनी अभिनंदन यांना ताब्यात घेतले. ‘अभिनंदन यांनी या तरुणांना मोठ्या धाडसाने खूपच झुंजवले’, असे प्रत्यक्षदर्शी महंमद रज्जाक चौधरीने सांगितले.

भारताचा शूर योद्धा अभिनंदन यांना गुरुवर्यचा सलाम.....!