twitter
rss

‘त्यांनी इंग्रजीची भीती घालवली होती’
या शाळेतील विद्यार्थ्यांनाही इंग्रजी भाषेचा न्यूनगंड होता. ही भीती दूर घालवण्यात सर्वात मोठा वाटा होता तो भगवान सरांचा

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: June 24, 2018 10:00 AM

तामिळनाडूतील वेलियाग्राम येथील सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना ते इंग्रजी शिकवायचे.
दोनएक दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या या फोटोनं अनेकांच्या डोळ्यात पाणी आणलं. ‘शिक्षक असावा तर असा’ असं कौतुक अनेकांनी हा फोटो पाहून केलं. आयुष्यात पैसे कमावणं महत्त्वाचं नसतं तर तुम्ही जीव लावणारी माणसंही कमावली पाहिजे असं म्हणतात. २८ वर्षीय भगवान यांनी हे सिद्ध करू दाखवलं. तामिळनाडूतील वेलियाग्राम येथील सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना ते इंग्रजी शिकवायचे. चार वर्षांपूर्वी ते या शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. अनेक विद्यार्थ्यांसारखा या शाळेतील विद्यार्थ्यांनाही इंग्रजी भाषेचा न्यूनगंड होता. इंग्रजीची भीती या मुलांनाही होती. पण ही भीती दूर घालवण्यात भगवान सरांचा वाटा सर्वात मोठा होता, म्हणूनच अल्पावधितच ते सर्व विद्यार्थ्यांचे प्रिय शिक्षक झाले होते.
या गावातील अनेक विद्यार्थी गरीब कुटुंबातले आहेत. कोणाचे वडील शेतकरी आहे. तर कोणाची आई सफाई कामगार आहे तर कोणाचं आई-वडील मजूरी करून पोट भरत आहेत. या गरीब घरातून आलेल्या मुलांच्या स्वप्नांना भगवान यांनी दिशा दिली. ‘भगवान सरांनी इंग्रजीची भीती घालवली. आज इंग्रजी हा माझा सर्वात आवडता विषय आहे. त्यांनी नवीन पुस्तकांची ओळख मला करुन दिली. त्यांच्यामुळे कठीण वाटणाऱ्या इंग्रजी विषयात मी पास झालो. ‘ असं आठवीत शिकणारा कार्तिक सांगत होता.

NEXT

तामिळनाडूतील वेलियाग्राम येथील सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना ते इंग्रजी शिकवायचे.
दोनएक दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या या फोटोनं अनेकांच्या डोळ्यात पाणी आणलं. ‘शिक्षक असावा तर असा’ असं कौतुक अनेकांनी हा फोटो पाहून केलं. आयुष्यात पैसे कमावणं महत्त्वाचं नसतं तर तुम्ही जीव लावणारी माणसंही कमावली पाहिजे असं म्हणतात. २८ वर्षीय भगवान यांनी हे सिद्ध करू दाखवलं. तामिळनाडूतील वेलियाग्राम येथील सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना ते इंग्रजी शिकवायचे. चार वर्षांपूर्वी ते या शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. अनेक विद्यार्थ्यांसारखा या शाळेतील विद्यार्थ्यांनाही इंग्रजी भाषेचा न्यूनगंड होता. इंग्रजीची भीती या मुलांनाही होती. पण ही भीती दूर घालवण्यात भगवान सरांचा वाटा सर्वात मोठा होता, म्हणूनच अल्पावधितच ते सर्व विद्यार्थ्यांचे प्रिय शिक्षक झाले होते.
या गावातील अनेक विद्यार्थी गरीब कुटुंबातले आहेत. कोणाचे वडील शेतकरी आहे. तर कोणाची आई सफाई कामगार आहे तर कोणाचं आई-वडील मजूरी करून पोट भरत आहेत. या गरीब घरातून आलेल्या मुलांच्या स्वप्नांना भगवान यांनी दिशा दिली. ‘भगवान सरांनी इंग्रजीची भीती घालवली. आज इंग्रजी हा माझा सर्वात आवडता विषय आहे. त्यांनी नवीन पुस्तकांची ओळख मला करुन दिली. त्यांच्यामुळे कठीण वाटणाऱ्या इंग्रजी विषयात मी पास झालो. ‘ असं आठवीत शिकणारा कार्तिक सांगत होता.
महत्त्वाच्या बातम्या
इंग्लंडचा विक्रमी विजय; ऑस्ट्रेलियावर २४२ धावांनी मात
VIDEO - या देशात खातात मातीच्या रोटी, नका वाया घालवू अन्न सेहवागचा संदेश
जेव्हा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अजिंठा- वेरुळ लेणी पाहण्यासाठी येतो
‘आम्ही छोट्याशा खेडेगावात राहणारी मुलं आहोत. इंग्रजीचा न्यूनगंड आमच्यामध्येही होता. पण त्यांच्यामुळे आज मी इंग्रजीत रोजनिशी लिहू लागले. मुलाखत, लोकांशी संवाद साधताना इंग्रजी येणं गरजेचं आहे. आज आम्ही उत्तम इंग्रजी लिहू, वाचू, बोलू शकतो ते केवळ भगवान सरांमुळे’ चौदा वर्षांची काव्या सरांबद्दल भरभरून बोलत होती. या गावात राहणारे धनराज यांना दोन मुली आहेत. भगवान सरांची बदली झाल्यापासून त्यांच्या दोन्ही मुलींनी शाळेत जायला नकार दिला आहे. इतकंच नाही तर ज्या शाळेत भगवान सरांची बदली झाली आहे त्याच शाळेत आमचंही नाव घाला असा हट्ट या मुलींनी केला आहे. ‘दी इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना धनराज यांनी माहिती दिली.

‘भगवान सर शाळा सुटल्यानंतरही विद्यार्थ्यांसोबत वेळ घालवायचे, पालकांशीही त्यांचे चांगले संबंध होते. वर्गातील प्रत्येक मुलांच्या पालकांना ते ओळखायचे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल त्यांच्याशी बोलायचे, त्यामुळे त्यांचं विद्यार्थ्यांशी नातं शिक्षकापलिकडचं होतं’, असंही काही शिक्षक सांगत होते. भगवान यांची बदली होऊ नये यासाठी अनेक पालकांनी प्रयत्नदेखील केले पण, नियमांपुढे कोणाचंही चालेना.
भगवान यांना मनावर दगड ठेवून बाहेर पडावं लागलं पण, ‘या विद्यार्थ्यांच्या मनातली इंग्रजीची भीती आपण दूर केली, त्यांना वाचनाची गोडी लावली यातचं आपलं सर्वात मोठं यश आहे’ हे समाधान घेऊनच भगवान पुढच्या प्रवासाला निघाले आहेत.

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣5⃣0⃣

*🌳झाडे जगली पाहिजेत म्हणून सुट्टीतही शिक्षकाची धडपड*

_*पांडोझरीच्या दिलिप वाघमारे यांचा स्तुत उपक्रम: शाळा बनलीयं पर्यावरण पुरक*_

June 05, 2018  Sangli

संख : दुष्काळी जत तालुक्यातील पूर्व भागात पिके व झाडांसाठी तर दूरच, पण पिण्यासाठीही पाणी मिळणे कठीण. अशा परिस्थितीत आसंगी तुर्क केंद्रातील पांडोझरी येथील बाबरवस्ती शाळेतील प्रयोगशील शिक्षक दिलीप वाघामारे (मूळ गाव बोळेगाव, ता. बिलोली, जि. नांदेड) हे सलग तीन वर्षे सुटीचा वेळ देऊन विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांना सोबत घेऊन शाळेतील झाडे वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत.पूर्व भागातील पांडोझरी येथे बाबर वस्तीवर जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. शाळेला येणारा कच्चा रस्ता... खडकाळ माळरानावर मराठी पहिली ते चौथीचे वर्ग आहेत. शाळेत ४९ विद्यार्थी आहेत. शाळेच्या आवारात लिंबू, कडूनिंब, करंजी, चिंच, डोंगरी झाड, नारळ, सीताफळ, गुलमोहर, मोरपंखी, चाफा, अशोक, जास्वंद अशी वेगवेगळी 69 झाडे लावली आहेत. सध्या उन्हाळी सुटी सुरू आहे. सुटी असतानाही शिक्षक दिलीप वाघमारे हे सलग तीन वर्षे सुटीतही विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांना सोबत घेऊन झाडांना दररोज सकाळी पाणी देतात. शिक्षकांसोबत चिमुकली मुलेही भर उन्हात पाणी देऊन झाडांचे संवर्धन करीत आहेत.
पांडोझरी येथील दुंडाप्पा कलादगी या टँकरमालकाने एक खेप मोफत पाणी दिले आहे. परिसरात पाणी विक्री तेजीत सुरूअसताना त्यांनी चिमुकल्या मुलांसाठी शाळेला मदत म्हणून पाण्याचा टँकर मोफत दिला आहे. शेतकरी मायाप्पा केरुबा गडदे यांनीही स्वत:ची फळबाग असतानाही महिन्यातून एकदा शेतातील कूपनलिकेचे पाणी शाळेपर्यंत पाईपलाईन करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
दिलीप वाघमारे केवळ आठ दिवस गावी जाऊन आले. वेगवेगळे उपाय वापरुन झाडे वाचविण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. सुटीचा इतर वेळ शाळेसाठी देऊन दररोज सकाळी मुलांसोबत ते झाडांना पाणी देतात. विकास गडदे, अनिल गडदे, नितीन गडदे, हर्षवर्धन मोटे, अधिक मोटे, अस्मिता लोखंडे, वेदिका गडदे, राहुल गडदे, विश्वराज कोरे, शैलेश कोरे, अमीर जमखंडीकर, प्रथमेश बाबर, प्रतीक्षा बाबर, अरविंद कांबळे, काखंडकी अर्जुन, प्रदीप मोटे, अश्विनी गडदे, आरती कोरे, आदिती कोरे, श्रेया वज्रशेट्टी, रुक्मिणी काळे, क्षमा मोटे हे विद्यार्थी आळीपाळीने झाडांना पाणी देतात.

*शाळा समितीचे पाठबळ*

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबू मोटे व केंद्रप्रमुख रमेश राठोड, गटशिक्षण अधिकारी भाऊसाहेब जगधने, आर. डी. शिंदे, माजी जि. प. अध्यक्ष अण्णासाहेब गडदे, सरपंच जिजाबाई कांबळे, उपसरपंच नामदेव पुजारी, सलिमा मुल्ला यांची साथ आणि पालक मारुती बाबर, तुकाराम कोरे, तुकाराम बाबर, गुलाब गडदे, राजाराम गडदे, प्रकाश बाबर, आप्पासाहेब मोटे, धयाप्पा गडदे, आप्पासाहेब गडदे, माणिक बाबर, नामदेव मोटे-सावंत, गोविंद कोकरे, संतोष बजंत्री, वज्रशेट्टी निंगाप्पा, दत्तात्रय कोरे, संजय गडदे, तानाजी कोकरे, अधिक कोकरे यांचे सहकार्य आहे.

_*गेल्या काही वर्षांत वृक्षतोड होत असल्यामुळे ग्रामीण भाग उजाड होत चालला आहे. ग्रामीण भागात शेतात, घरासमोर किमान एक झाड लावून त्याचे संवर्धन करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जागृती करणे, हा उद्देश आहे. झाडांची संख्या वाढून पर्यावरणाचे संतुलन राखले जाईल.*_

*- दिलीप वाघमारे, सहशिक्षक*

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣4⃣9⃣

*🎓आई वडिलांना एवढच कळालं की मुलगा साहेब झाला*

साभार - दैनिक पुढारी,
जव्हार : तुळशीराम चौधरी

पालघर जिल्ह्याच्या जव्हार तालुक्यातील वाळवंडा पैकी खडकीपाड्यातील कल्पेश जाधवने याने एमपीएससी परीक्षेत यश मिळविले. खडकीपाड्यात रस्त्याची सोय नसून, एसटी बसही जात नाही. या पाड्यात जाण्यासाठी ओहळातून कच्ची पायवाट आहे. आदिवासी पाड्यात राहून शेती करणारे कल्पेशचे आई-वडील निरक्षर असून, डोंगर उतारावर त्‍यांना दीड एकर शेती आहे. अशा परिस्थितीतून शिक्षणाच्या  दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर कल्पेश चंदर जाधवने पहिल्याच प्रयत्नात राज्यसेवा परीक्षेत यश संपादन  केले आहे. इतकेच नाही, तर यंदा राज्यसेवा परिक्षेत कल्पेश जाधव हा उत्तीर्ण उमेदवारांमधील तो सर्वात कमी वयाचा उमेदवार ठरला आहे. आता तो राज्य शासनाच्या कौशल्य विकास विभागात उपसंचालक म्हणून रुजू होणार आहे. त्याच्या या यशामुळे आई वडिलांना तर आनंद झालाच आहे. मात्र, गाववाल्यांना देखील मोठा आंनद झाला आहे.

जव्हार तालुक्यातील वाळवंडा पैकी खडकीपाड्यातील कल्पेश जाधवची घरची परिस्थिती अगदी बेताची आहे. कल्पेशचे शिक्षण खडकीपाडा येथे इयत्ता ४ थी पर्यंतचे शिक्षण जि.प. शाळेत झाले आहे. माध्यमिक शिक्षण कावळे आदिवासी आश्रम शाळेत असून, १२ वीपर्यंतचे शिक्षण बोर्डीच्या कनिष्ठ महाविद्यालयातून विज्ञान शाखेतून घेतले. पदवीचे शिक्षण घेण्यासाठी कल्याण येथील आदिवासी वसतिगृहात राहून बिर्ला महाविद्यालयातून गणित विषय घेवून पदवी घेतली आहे. पदवीच्या दुसऱ्या वर्षाला शिक्षण असताना एमपीएससी स्पर्धा परीक्षांची काश धरली आणि त्यांने कोणत्याही शिकवणीशिवाय केवळ युटय़ूबवरचे व्हिडिओ पाहून पूर्व परीक्षेची तयारी केली.

कल्पेशच्या आई वडिलांच्या म्हण्यानुसार, कल्पेश घरी यायचा त्‍यावेळी म्हणायचा मी जेव्हा साहेब होईन तेव्हाच बूट घालेन. घरच्या गरिबीमुळे कल्पेशला कोणतेही क्लास लावणे किंवा कोणाचे मार्गदर्शन घेणे त्याला शक्य झाले नाही. मात्र, कल्पेश नेहमी म्हणायचा की आई मी साहेबच होणार, हे आमच्या मुलाने करून दाखविले, तो साहेब झाला असं आम्हला मोठ्या मुलांने दुस-यांकडे फोन लावून कळविले. कल्पेश जाधवच्या यशामुळे आता तो राज्य शासनाच्या कौशल्य विकास विभागात उपसंचालक म्हणून रुजु होणार असल्याचे त्यांनी पुढारी ऑलाईनशी बोलतांना सांगितले. आता प्रशासकीय सेवा करताना उत्तम काम करण्याला प्राधान्य देणार आहे,’ अशी भावना कल्पेशने व्यक्त केली.

आम्ही अडाणी आम्हला काय माहिती तो काय झाला. परंतु तो साहेब झाला? हे समजले. एमपीएससी म्हणजे काय हे आई-वडिलांना माहीतच नाही. परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे सकाळी सांगितल्यावरही त्यांना काही कळले नाही. अखेर सोप्या शब्दांत त्यांना ‘मी साहेब झालो’ एवढेच सांगितल्यावर ते आनंदित झाले. त्यानंतर ते मजुरीच्या कामाला निघूनही गेले, असे कल्पेशने सांगितले. तेव्हा ते गावभर सांगत होते की, आमचा मुलगा साहेब झाला.

महाराष्ट्र राज्य स्वाभिमान शिक्षण संघटनेकडून कल्पेश जाधवच्या आई वडिलांचे श्रीफळ व पुष्पहार देवून स्वागत करण्यात आले. गावात व्यवस्थित कुठलीही शिक्षण सुविधा नसतानाही कल्पेशने राज्यसेवा परीक्षेत मिळविलेले यश हे महत्वाचे आहे. त्यामुळे त्याचा आणि त्यांच्या अडाणी अशिक्षित कुटुंबाचा आम्ही शिक्षक स्वाभिमान शिक्षक संघटनेतर्फे आभिनंदन करतो. स्वाभिमान शिक्षक संघटनेच्या अध्यक्षेच्या म्हन्यानुसार हा आमच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी आहे. त्यामुळे आम्हलाही त्याचा खूप अभिमान वाटतो आहे. असे स्वाभिमान शिक्षक संघटनेचे अध्यक्ष महेंद्र साहरे, श्याम भोये यांनी सांगितले.

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_