twitter
rss

जिमनँस्टीक दीपा कर्मकारचा खेळाडू आणि विद्यार्थ्यांसमोर आदर्श


मायदेशी येताच दुसऱ्या दिवशी दीपानं दिली परीक्षा

मटा ऑनलाइन वृत्त । आगरतळा

रिओ ऑलिम्पिकमध्ये व्हॉल्ट जिमनॅस्टीक प्रकारात 'तेजस्वी'
कामगिरी करून दीपा कर्मकार मायदेशी परतली. त्यानंतर
दुसऱ्याच दिवशी तिनं एमए (M.A) पॉलिटीकल सायन्सचा पेपर
दिला. आपल्या या कर्तुत्त्वानं तिनं खेळाडूंसोबतच
विद्यार्थ्यांसमोरही एक वेगळाच आदर्श घालून दिला.
अंतिम फेरीत दीपाचं पदकाचं स्वप्न थोडक्यात भंगलं. त्याचा
तिला दुःख झालं; पण याचा परिणाम अभ्यासावर होऊ न
देण्याचा निश्चय तिनं केला. रिओतून भारतात परतल्यानंतर
दुसऱ्याच दिवशी तिनं त्रिपुरा विद्यापीठाच्या मुक्त
अभ्यासक्रमांतर्गत एमए पॉलिटिकल सायन्सच्या दुसऱ्या
सेमिस्टरची परीक्षा दिली. मला लवकरच 'मास्टर्स डिग्री'
मिळेल, असा विश्वास तिनं व्यक्त केला. तसंच यावेळी पदकानं
हुलकावणी दिली असली तरी, अधिक मेहनत करून २०२० च्या
टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवेन, असा निर्धार व्यक्त
करतानाच तिनं अभ्यासाकडे दूर्लक्ष न करण्याचे ठरवले आहे.
दीपा परीक्षा देण्यासाठी दुसऱ्याच दिवशी केंद्रात हजर
राहिल्यानं विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनाही आश्चर्याचा
धक्काच बसला. खेळासाठी इतका वेळ देऊनही अभ्यासातील
तिची गोडी थोडीही कमी झाली नाही, अशा शब्दांत
अधिकाऱ्यांनी तिचं कौतुक केलं. परीक्षेला 'दांडी'
मारण्यासाठी अनेक कारणं शोधणाऱ्या विद्यार्थ्यांनी
दीपाचा आदर्श ठेवावा, असा सल्लाही त्यांनी दिला.

*रिओला नेली होती अभ्यासाची पुस्तके*

जिमनॅस्टीकच्या सरावाताच दीपाचा बराचसा वेळ जात असला
तरी, तिनं कधीही अभ्यासाकडं कानाडोळा केला नाही, असे
तिचे कुटुंबीय सांगतात. ऑलिम्पिकसाठी जाताना तिनं
आपल्यासोबत अभ्यासाची पुस्तकेही नेली होती. दोन
सामन्यांमध्ये जास्त दिवसांचे अंतर होते. यादरम्यान तिनं तिथं
परीक्षेची तयारी केली. तिच्या अभ्यासाबद्दल बोलताना
तिची आई गौरी कर्मकार सांगतात की, "ती मला नेहमी म्हणते
की, आई खेळ हा खेळाच्याच जागी आणि शिक्षण
शिक्षणाच्या जागी आहे. मला मास्टर्सची डिग्री
मिळवायचीच आहे."

पुलेला गोपीचंद



पुलेला गोपीचंद खरंच कोण आहे 

पी व्ही सिंधुनी रियो ऑलिम्पिक मध्ये केलेल्या चमकदार कामगिरीमुळे आणि मिळवलेल्या रजत पदकामुळे तिचे सध्या सर्वत्र कौतुक होते आहे. परंतु तिच्या ह्या यशाच्या मागे एका व्यक्तीचे मोठे कष्ट आणि योगदान आहे. ते म्हणजे तिचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद. खरं म्हणजे पुलेला गोपीचंद हे नाव भारतीय खेळप्रेमींना चांगलेच परिचयाचे आहे. २००१ साली इंग्लंड मध्ये झालेल्या बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये ते विजेते होते. हि स्पर्धा जिंकणारे ते दुसरे भारतीय आहेत. (पहिले प्रकाश पदुकोन).  परंतु त्यांची तेवढीच ओळख पुरेशी नाही. स्पर्धा जिंकल्यानंतर गोपीचंदला कोका कोला कडून कोट्यावधीची जाहिरातिची ऑफर आली होती. कोका कोला हा मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक असतो म्हणून ह्याने ती जाहिरात नाकारली. ज्या देशात सख्खी आई आपल्या मुलाला मॅगी, चिप्स, पिझ्झा, कोलाच्या "सकस" अन्नावर पालन पोषण करतांना दिसत आहेत तिथे गोपीचंदच्या ह्या निर्णयाचे कौतुक सोडा कोणी दखल पण घेतली नाही. पुढे गोपीचंद खेळतांना जख्मी झाले आणि त्यांना बॅडमिंटन खेळणे थांबवावे लागले. स्वतः खेळणे बंद केले म्हणून त्यांचे खेळाविषयीचे प्रेम कमी झाले नाही. त्यांनी निर्णय घेतला बॅडमिंटन प्रशिक्षण केंद्र उघडण्याचा.
आंध्रप्रदेश शासनाने गोपीचंद यांची खेळातील कामगिरी पाहून त्यांना स्वस्त दरात हैदराबाद मध्ये ५ एकर जमीन दिली होती. त्यावर त्यांना स्वतःची अकादमी उघडायची होती. एकूण १३ कोटी चा हा प्रोजेक्ट होता. पण एवढे पैसे आणायचे कुठून? कोणी मदतीला तयार होत नव्हते. इथे IPL चा काळा बाजार नव्हता. देशासाठी खरे खेळाडू निर्माण करायचे होते. गोपीचंद यांनी स्वता:चे राहते घर गहाण ठेवले.  त्यातून ३.५ कोटी भेटले. मग निम्मा गुत्ता प्रसाद नावाचे व्यापारी त्यांच्या मदतीला आले. त्यांनी ५ कोटी देण्याची तयारी दाखवली. परंतु अट ठेवली बॅडमिंटन मध्ये भारताला एक पदक मिळवून देण्याची. गोपीचंद यांनी त्याची परतफेड केली २०१२ ला. जेव्हा साईना नेहवाल ला ब्रॉन्झ पदक मिळालं. आणि आता सिंधूच्या सिल्व्हर पदकानी त्याची दुप्पट व्याजासहित परतफेड केली. पण गोष्ट इथेच संपत नाही. इथून सुरु होते. १२ वर्ष गोपीचंद अकादमीत रोज सकाळी ४ वाजता जातात. आणि खेळाडूंच्या प्रशिक्षणाला सुरुवात करतात. ऑलिम्पिक मध्ये आणि स्पर्धेच्या आधी सुद्धा  प्रशिक्षकाने किती दक्ष राहावे हे गोपीचंद कडून शिकावे. सिंधूला गोपीचंद यांच्या परवानगी शिवाय देवाचा प्रसाद पण घेण्याची परवानगी नव्हती. ती फक्त गोपीचंद सोबत जेवण करायची. इतकी दक्षता प्रशिक्षकाने पाळली पाहिजे नाहीतर  केव्हाही शिष्याची गत नरसिंग यादव सारखी होऊ शकते.
जिथे आपल्याकडे ज्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी match fixing करून देशाच्या अब्रूचे धिंडवडे काढले. अशांना लोकांनी खासदार बनवून डोक्यावर घेतले. त्यांच्यावर चित्रपट काढून त्यांना 'हिरो' बनविण्याचे प्रयत्न केले गेले. जिथे प्रसिद्धी मिळवण्यासाठी ऑलिम्पिक खेळण्यासाठी गेलेल्या खेळाडूंना नाव ठेवून काही व्यक्ती स्वतः ची "शोभा" करून घेतात. तिथे कोणी पुलेला गोपीचंद हा निष्ठेने खेळाच्या माध्यमातून देशाचे नाव मोठे करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचे हे कार्य आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी हा लेख प्रपंच. आता तरी देश गोपीचंद सारख्या प्रामाणिक खेळाडूंना साथ देईल का?

  _*मोहित विनोद कुलकर्णी*_

📚📕📗📘📙📔📒📚


_*संकलन - गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

विद्यार्थ्यांनी तयार केला सौरऊर्जेवरील ‘एसी’

म. टा. वृत्तसेवा, येवला

तंत्रनिकेतन अथवा अभियांत्रिकी कॉलेज म्हंटले की त्यातील भावी अभियंत्यांच्या अंगी असलेला जिज्ञासूपणा अन् विज्ञान युगातील वाटचाल लक्षात घेऊन शोधक वृत्तीने टाकलेले पाऊल हमखास समोर येते. येवला तालुक्यातील बाभूळगाव येथील एसएनडी अभियांत्रिकी कॉलेजच्या चौथ्या वर्षातील यंत्र अभियांत्रिकीच्या तीन विद्यार्थ्यांनी शोधक वृत्तीतून सौरऊर्जेवर चालणारे 'एअर कंड‌िशनिंग उपकरण' साकारण्याची किमया केली आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पर्यावरणपूरक अन् विजेची बचत करणाऱ्या उपकरणाची दखल या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये देखील घेण्यात आली आहे.
सर्वसामान्यपणे 'व्हेपर कॉम्प्रेशन सिस्ट‌िम'चा वापर करून 'एअर कंड‌िशनिंग'ची निर्मिती केली जात असते. त्यासाठी विविध रेफ्रिजरेंट वापरले जातात. मात्र, त्यातील काही रेफ्रिजरेंट हे पर्यावरणास घातक समजले जातात. तसेच त्यांची किंमत देखील अधिक असते. मात्र एसएनडीच्या चौथ्या वर्षातील यंत्र अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी मात्र या 'व्हेपर कॉम्प्रेशन सिस्टीम'चा वापर न करता इतर पर्यायांचा अभ्यास करून 'पेल्टीयर ईफेक्ट'वर आधारित एअर कंडीशनिंग उपकरण बनवले आहे. यामध्ये त्यांनी सौर उर्जा प्लेट, पेल्टीयर मॉडूल, पंखा, हिट शिंक, बॅटरी आदींचा वापर केला. या उपकरणाचा मानवी जीवनावर तसेच पर्यावरणावर कुठल्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही. तसेच सौर उर्जाचा वापर केल्यामुळे विजेची बचत होते, असा दावा या विद्यार्थ्यांनी केला आहे.

सुमित खंडीझोड, खलिल शेख, बिपीन ढोकळे, तुषार सिंगर या यंत्र अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या कष्टाने या उपकरणाची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे या प्रोजेक्टवर विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकीच्या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रबंध देखील प्रसिद्ध केला आहे. हे उपकरण बनवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रा. एस. जी. सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्य डॉ. एम. ए. व्येंकटेश, प्रा. व्ही. जी. भामरे, प्रा. एस. पी. बडगुजर आदींनी या विद्यार्थ्यांच्या शोधवृत्तीचे तालुक्यात तसेच शैक्षणिक वर्तुळात कौतुक केले.

📚📕📗📘📙📔📒📚

संकलन   
गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली 

संकटावर मात करत पिता-पुत्रांची "स्वप्नील'भरारी

- - सकाळ वृत्तसेवा


मालेगाव - संकटे कितीही येवोत, नाउमेद न होता त्यातून मार्ग काढत विजयाचे लक्ष्य ठेवून वाटचाल कशी करायची, हे शिकावे ते नाशिक जिल्ह्यातील अरुण पवार व वैभव पवार या पिता-पुत्रांकडून. अनेक वर्षांच्या पोल्ट्री उद्योगात प्रत्येक संकटाने त्यांच्या क्षमतेची परीक्षा पाहिली. मात्र, हिंमत, चिकाटी, अन्य पूरक व्यवसायाचा आधार, व्यावसायिक सलोखा जपणे, मेहनत आदी गुणांच्या आधारावर "स्वप्नील ऍग्रो ऍण्ड पोल्ट्री‘ कंपनी स्थापन केली. त्याची उलाढाल सुमारे 25 कोटींच्या घरात पोचवण्यापर्यंत त्यांनी मजल मारली आहे.

देवळा व चांदवड या दुष्काळी तालुक्‍यांच्या सीमेलगत वडाळागावातील बी.एस्सी., बी.एड. झालेले अरुण पवार शिक्षकीसेवेत कार्यरत होते. त्यांनी पोल्ट्री व्यवसाय सुरू केला तो एक हजार पक्ष्यांपासून. भांडवलाची स्थिती बिकट असताना श्री. पवार नेटाने या उद्योगात उतरले. पुढे शिक्षक व शेतकरी अशा दोन्ही आघाड्या एकावेळी सांभाळणे शक्‍य न झाल्याने नोकरीचा राजीनामा देत ते पूर्णवेळ पोल्ट्री उत्पादक झाले. अर्थात, या वेळचा प्रवास सोपा नव्हता. मुंबईच्या एका व्यापायाने पिल्ले खरेदी केली आणि मालासह पोबारा केला. दरम्यानच्या काळात पोल्ट्रीला जोड म्हणून सात एकर क्षेत्रावर भगव्या डाळिंबाची लागवड केली. पुढे ही संपूर्ण डाळिंब शेती तेल्याच्या कचाट्यात सापडली अन्‌ संपूर्ण बाग काढून टाकावी लागली. त्यानंतर वाइन द्राक्षाची लागवड केली व पुढील वर्षात वाइन उद्योगाचेही तीन तेरा वाजले. या काळात पोल्ट्री व्यवसाय हळूहळू रुळत चालला होता. या व्यवसायातून घरप्रपंचाला आधार मिळण्याइतके उत्पन्न मिळत होते. मात्र, लागोपाठ दोन वर्षांच्या अंतराने "बर्ड फ्लू‘च्या साथीच्या तडाख्याने पवार यांना झोडपून काढले. या काळात पावणेदोन लाख पक्ष्यांचे नुकसान झाले. जोडव्यवसाय म्हणून त्यांनी जेसीबी मशिन घेतले. मात्र, उत्पन्नापेक्षा उधारीच अधिक झाल्याने हा व्यवसायही बंद करावा लागला.


यानंतर वैभव पवार यांचे या व्यवसायात आगमन झाले. कृषी पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेत वैभवने कुक्कुटपालन हा विषय अधिक तन्मयतेने समजून घेतला. पॅंरेट्‌स पक्षी (बीडर) फार्म सुरू करण्याची कल्पना सुचली आणि ती त्यांनी प्रत्यक्षात आणली. बीडर फार्मचे पक्षी याच उद्योगातील एका आघाडीच्या कंपनीकडून घेतले जातात. त्यापासून अंडी व पक्षी तयार केले जातात. व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळावी म्हणून वैभवने एमबीए अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. व्यवसायातील सखोल बारकावे, बाजारातील उलथापालथ समजावून घेतली. राज्याबाहेर जाऊन अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांतील लोकांच्या भेटी घेतल्या. शिक्षण, अनुभव, नवीन तंत्रज्ञान आणि मेहनतीच्या जोरावर विविध ठिकाणी व्यवसायाच्या जागी जाऊन पाहणी केली. अनावश्‍यक खर्चावर निर्बंध घातले तर उत्पादन खर्चात आमूलाग्र बदल होतो, हे वैभवला समजले. व्यापाऱ्यांकडून माल खरेदी करण्यापेक्षा स्वत:च अडतदार होऊन थेट शेतकऱ्यांकडून मका खरेदी करण्यास सुरवात केली. वजनकाट्याचा व्यवसाय सुरू केला. वाया जाणाऱ्या घटकांवर नियंत्रण, खेळत्या भांडवलाची तजवीज, पक्ष्यांना पाण्यासाठी निपल सिस्टिम, खाद्य देण्यासाठी स्वयंचलित पद्धतीचा वापर केला. जिद्द, चिकाटी, नवनवीन तंत्रज्ञानाचा सतत अभ्यास आणि मेहनतीच्या जोरावर वैभवने आपला पोल्ट्री व्यवसाय एका नव्या उंचीवर नेला आहे.

मजूर दांपत्याची कन्या झाली "सी.ए"


- - सकाळ वृत्तसेवा

पाचोरा - मेहनत, जिद्द, चिकाटी आणि परिश्रम करण्याची तयारी असेल, तर कोणतेही ध्येय साध्य करता येते. बेताची आर्थिक परिस्थितीही अशा ध्येयवेड्यांचा आड येऊ शकत नाही, याची प्रचिती खरजई (ता. चाळीसगाव) येथील मूळ रहिवासी असलेल्या संगीता कदम हिने दिली आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून चार्टर्ड अकाउंटंट (सी.ए.) झालेल्या संगीताच्या यशाने मजुरी करणाऱ्या मायबापाच्याही कष्टाचे चीज झाल्याची यशोगाथा अन्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

खरजई (ता. चाळीसगाव) येथील राजेंद्र गोपीचंद कदम हे पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या कुटुंबीयांसह नाशिकला वास्तव्यास आहेत. ते सेंट्रिंग काम करतात, तर त्यांच्या पत्नी बेबाबाई कदम धुणे, भांडी व स्वयंपाकाची कामे करून फाटक्‍या संसाराला ठिगळ लावण्याचा प्रयत्न करतात. कदम दाम्पत्याला तीन मुली असून, या मुलीही शिक्षणासोबत आई-वडिलांना मदतीचा हात देतात.

*काम करून शिक्षण*

संगीता ही घरातील मोठी मुलगी. भाऊ नसल्याने आपण आई-वडिलांना मुलाप्रमाणे आधार द्यावा, या विचाराने प्रेरित झालेली. संगीताने प्रतिकूल परिस्थितीत आईसोबत कामाला जाऊन मिळेल तेवढ्या पैशांतून वाणिज्य शाखेचे शिक्षण घेतले. चांगल्या मैत्रिणींचा सहवास आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्याने तिने सी.ए. होण्याचा निर्धार केला आणि अभ्यासासाठी कंबर कसली. या कुटुंबातील एकमेव शिक्षित असलेले संगीताचे काका मो. ग. कासार (भडगाव) यांनी संगीताला वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यामुळे पहिल्याच प्रयत्नात संगीता सी.ए. परीक्षा उत्तीर्ण झाली. संगीताची ही भरारी खरजई परिसरात कौतुकाचा विषय बनली आहे.

📚📕📗📘📙📔📒📚

*संकलन -* 

_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

गरजूंपर्यंत शिक्षणाची गंगा पोचवणारे शिक्षक


नवीन पिढी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते. शिक्षकांनी केलेल्या संस्कारांवरच विद्यार्थ्यांची जडणघडण अवलंबून असते, असे म्हणतात. अर्थात, हे शिक्षक म्हणजे चार भिंतींत शिकवणारे एवढ्यापुरते मर्यादित नाही, तर भिंतीबाहेरही अनौपचारिक शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञानदान करणारे शिक्षकही तितकेच आपल्यासाठी महत्त्वाचे घटक असतात. आदिवासी भागात, खेड्यापाड्यांत, तसेच रात्रीच्या शाळेत, रस्त्यावरच्या दिव्याखाली वंचितांना, गरजूंना शिक्षण देणारे शिक्षक हे नेहमीच आदर्श राहिलेले आहेत. अशाच काही आदर्श शिक्षकांचा येथे उल्लेख करता येईल.


*कोरकूंच्या लेकरांसाठी*

कोरकू आदिवासींच्या मुलांमध्ये शाळा सोडण्याचे आणि शाळेत न जाण्याचे प्रमाण मोठे आहे. ही मुले असे का करतात, याचा शोध ‘उन्नती इन्स्टिट्यूट फॉर सोशल अँड एज्युकेशनल चेंज’ या संस्थेने घेतला. त्यांना कारण सापडले. कोरकू मुलांची मातृभाषा कोरकू आणि शिक्षणाची भाषा मराठी. या मराठीचीच त्यांना भीती वाटते. ती घालवण्यासाठी देशमुख महिन्यातून दोनदा अकोल्याला जातात. तिथल्या कोरकू मुलांना मराठीचे धडे देतात. गोरेगाव येथील दी शिक्षण मंडळ या संस्थेमार्फत प. बा. सामंत शिक्षण समृद्धी प्रयास हे केंद्र चालवण्यात येते. त्याच्या प्रमुख म्हणून त्या काम पाहतात.


*गरीब विद्यार्थ्यांना आधार*


...तरीही ‘ती’ एमआयटीत पोहोचली. मुंबईकन्या मालविका जोशीची उत्तुंग भरारी


म. टा. प्रतिनिधी, मुंबई

दहावी आणि बारावीचे प्रमाणपत्र नसले की, कॉलेजामध्ये प्रवेश
ही मिळत नाही. मात्र मुंबईची कन्या मालविका जोशीने हे
समीकरण मोडत देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

दहावी आणि बारावी उत्तीर्णचे प्रमाणपत्र नसतानाही केवळ
आपल्या ज्ञानाच्या जोरावर या मालविकाने चक्क मॅसॅच्युसेट्स
इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये (एमआयटी) प्रवेश मिळवला
आहे. मालविकाचे कम्प्युटरमधील ज्ञान आणि ऑलम्पियाड
स्पर्धेतील तिची कामगिरी लक्षात घेता एमआयटीने
तिच्यासाठी शिक्षणाची कवाडे खुली करून दिली आहेत.
मालविकाच्या कामगिरीबद्दल सांगताना तिची आई सुप्रिया
जोशी म्हणतात, मालविकाने दादर पारसी युथ असेम्ब्ली या
शाळेत सातवीपर्यंत शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर आता
ती एमआयटीत बॅचलर ऑफ सायन्सचे शिक्षण घेत आहेत.
मालविकाने इंटरनॅशनल ऑलिम्पियाड ऑफ इन्फॉरमेटिक या
स्पर्धेत दोन रौप्य आणि एक कांस्य पदाची कमाई केली असून या
कामगिरीच्या जोरावर एमआयटीने तिच्याशी संपर्क साधत
तिच्यासाठी शिक्षणाची दालने खुली केली आहेत. यासाठी
तिला एमआयटीकडून शिष्यवृत्ती देखील देण्यात आली आहे.

मालविकाला कॉलेजमध्ये जाऊन शिक्षण घेण्यात
पहिल्यापासून फारसा उत्साह नव्हता. त्यामुळे तिने सुरुवातीला
एमआयटीने दिलेला प्रस्ताव फेटाळला होता. मात्र त्यानंतर
तिने संस्थेबाबत आणि अभ्यासक्रमाबाबत माहिती गोळा केली,
आणि त्यानंतर होकार कळवला, असेही तिच्या आईने सांगितले.
तिच्याकडे दहावी आणि बारावीची मार्कशीट नसली तरी
एमआयटीत प्रवेश घेताना तिचे कयुटरमधील ज्ञानाचा एक
अहवाल मागवण्यात आला होता. त्यानंतरच तिची निवड
करण्यात आली, असेही तिच्या आईने सांगितले.
आपल्या मुलांनी दहावी आणि बारावीची परीक्षा दिली
नाही. तर पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होते.
मालविकाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असेही तिच्या
आईने सांगितले. तर मालविकाला आयआयटीत प्रवेश घ्यावायचा
होता. मात्र तिच्याकडे बारावीचे प्रमाणपत्र नसल्याने तिला
तिथे प्रवेश नाकारण्यात आला होता, असे तिचे शिक्षक महेंद्र
करकरे यांनी सांगितले.

📚📕📗📘📙📔📒📚

संकलन   

गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली

My First #Hologram_Video
This video is used for Hologram technology, just make the hologram device at home with a very simple way And Enjoy. This video is for learning alphabets with...
YOUTUBE.COM

३५ वर्षे लॉज च्या खोलीत राहून पगार विद्यार्थ्यांसाठी खर्च करणारे सीनियर कॉलेज चे प्राध्यापक


के.एस्. अय्यर सर


(शेअर करून प्रत्येक शिक्षकापर्यंत हे प्रेरक व्यक्तिमत्व पोहोचवावे )

_*एक अविश्वसनीय सत्यकथा !*_

- हेरंब कुलकर्णी .

*के. एस. अय्यर.* आपलं सगळं आयुष्य विद्यार्थ्यांसाठी वेचणारा एक निरलस
प्राध्यापक. पगारातला पैसा गरजेपुरताच ठेवून बाकीची रक्कम
विद्यार्थ्यांसाठीच त्यांनी खर्च केली. अय्यर सर मूळचे केरळचे; पण
महाराष्ट्र हीच त्यांची कर्मभूमी. गेली ३५ वर्षं त्यांचं वास्तव्य होतं
बारामतीत... एका लॉजमध्ये आठ बाय दहाच्या छोट्याशा खोलीत !
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रेरणेनं ते १९६८ मध्ये शिक्षकी पेशात
आले आणि गांधीजींच्या प्रभावातून त्यांनी ध्येयवाद अंगीकारला. अय्यर
सरांचं निधन पाच महिन्यांपूर्वी झालं. त्यांच्या तपस्वी जीवनाचं हे ओझरतं
दर्शन उद्याच्या (पाच सप्टेंबर) शिक्षक दिनानिमित्त...
श्रीकृष्ण रेस्टॉरंट, बारामती
रूम नंबर २०२
या रूममध्ये एक प्रवासी मुक्कामाला आला आणि त्यानं चेक आउट केलं ते थेट
३५ वर्षांनीच...

***

इस्रो’ची आणखी एक भरारी, PSLV C-35चं यशस्वी उड्डाण...🚀


भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘ इस्त्रो’ने आज (सोमवारी)आणखी एक इतिहास रचला आहे. इस्त्रोनं पीएसएलव्ही रॉकेटमधून, एकाच वेळी 8 उपग्रह दोन वेगवेगळ्या कक्षेत सोडले आहेत. विशेष म्हणजे मुंबई आयआयटीच्या विदयार्थ्यांनी तब्बल आठ वर्षे अथक परिश्रम घेऊन तयार केलेला ‘प्रथम’ या  लघुउपग्रहाचं सुध्दा अवकाशात यशस्वी प्रक्षेपण झाले.

आज सकाळी 9.10 मिनिटांनी श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अवकाश केंद्रावरून हे प्रक्षेपण करण्यात आलं. महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांनी तयार केलेला पहिला लघुउपग्रह असून, या लघुउपग्रहाचे प्रक्षेपण भारतीय अंतराळ संशोधनात एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे. त्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांसह अवघ्या देशाचे ‘प्रथम’कडे लक्ष लागून राहिलं होतं.

पीएसएलव्ही सी-35 हे 37 वं उड्डाण होतं. या वेळी प्रथमच दोन विविध कक्षांमध्ये उपग्रहांना सोडण्यात आले. वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी तयार केलेल्या स्कॅटसॅट-1 या 371 किलोच्या उपग्रहाबरोबरच ‘प्रथम’ आणि पायसॅट हे शैक्षणिक उपग्रह (दोन्ही भारत), अलसॅट-1 बी, अलसॅट-2 बी आणि अलसॅट-1 एन (सर्व अल्जेरिया) आणि पाथफाइंडर-1 व एनएलएस-19 हे अनुक्रमे अमेरिका आणि कॅनडाचे उपग्रह अवकाशात सोडले गेले.

आयआयटी मुंबईच्या एरोस्पेस इंजिनीअरिंग विभागात शिक्षण घेणाऱ्या सप्तश्री बंडोपाध्याय आणि शशांक तमासकर या विद्यार्थ्यांना जुलै 2007मध्ये ‘प्रथम’ची संकल्पना सुचली. त्यानुसार आयआयटीच्या एरोस्पेस इंजिनीअरिंगच्या विभागाने त्याची बांधणी सुरू केली. त्सुनामीसारख्या प्रलयाची पूर्वकल्पना देण्याची क्षमता ‘प्रथम’मध्ये आहे, असा दावा मुंबई आयआयटीने केला आहे. विशेष म्हणजे अवघ्या १० किलो वजनाच्या या उपग्रहाचे इस्रोनेही कौतुक केले आहे.

* 8 उपग्रह कोणती?*

1) भारताचा स्कॅटसॅट उपग्रह
( वजन 371, हवामानाची आणि समुद्रातील वातावरणाची ताजी माहीती, फोटो देणारा उपग्रह )

2) मुंबई आयआयआटी च्या विद्यार्थ्यांनी बनवलेला ‘प्रथम’ हा 10 किलोग्रॅमचा उपग्रह.
8 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर

3) बंगळूरच्या पीईएस विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी बनवलेला ‘पीसॅट’ हा 5.25 किलोग्रॅम वजनाचा उपग्रह.

4) अल्जेरीया देशाचे तीन उपग्रह आहेत.
( 117, 103 आणि 7 किलो वजनाचे उपग्रह )

5) अमेरिकेचा 44 किलोग्रॅम वजनाचा एक उपग्रह.

6) कॅनडाचा 8 किलोग्रॅम वजनाचा एक उपग्रह.

असे एकुण 8 उपग्रह इस्त्रो पीएसएलव्ही रॉकेटमधून अंतराळात दोन वेगवेगळ्या कक्षेत सोडणार आहे.

📚📕📗📘📙📔📒📚

*संकलन -* 

_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

स्वच्छतेत सिंधुदुर्ग जिल्हा देशात अव्वल



नवी दिल्ली - मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियानांतर्गत ग्रामीण भागातील
 स्वच्छतेबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्याने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. केंद्रीय ग्रामविकास व पेयजल मंत्रालयाने घेतलेल्या स्पर्धेत ग्रामीण स्वच्छतेबाबत अग्रेसर असलेल्या पहिल्या 75 जिल्ह्यात सिंधुदुर्गासह सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी व ठाणे या राज्यातील पाच जिल्ह्यांनी पहिल्या दहात स्थान पटकावले आहे. सिंधुदुर्गाच्या दृष्टीने हा खूप मोठा सन्मान मानला जात आहे.

राज्य म्हणून मात्र महाराष्ट्र ग्रामीण स्वच्छतेबाबत मागे म्हणजे 26 पैकी 15 व्या क्रमांकावर आहे. ग्रामस्वच्छतेबाबत सिक्कीम व स्वाभाविकपणे केरळने अव्वल स्थान मिळविले आहे.

ग्रामविकास व पेयजल मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी याबाबत घेतलेल्या राष्ट्रीय स्पर्धेचा निकाल आज जाहीर केला. मंत्रालयाचे मुख्य सचिव परमेश्‍वर अय्यर, पीआयबीचे घनश्‍याम गोयल, सरस्वतीप्रसाद, भारतीय गुणवत्ता परिषदेचे (ओसीआय) आदित्य अनुभाय आदी उपस्थित होते.

तोमर यांनी जाहीर केले की सिक्कीम व केरळ ही देशातील सर्वांत स्वच्छ राज्ये आहेत. बिहार शेवटच्या क्रमांकावर आहे व बिहार, उत्तर प्रदेशातील एकही जिल्हा पहिल्या 75 स्वच्छ जिल्ह्यात नाही. छत्तीसगड, झारखंड या राज्यांनीही ग्रामस्वच्छतेबाबत सुधारणा करण्याची गरज आहे. ग्रामस्वच्छतेसाठी केंद्राने पहिल्या टप्प्यात 12 हजार कोटींचा निधी राज्यांना दिल्याचेही त्यांनी नमूद केले