twitter
rss

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 5⃣0⃣3⃣

*चिखलठाणच्या शिक्षकाची सिडबॅंक देशविदेशात फेमस्‌*

साभार-गजेंद्र पोळ,दैनिक सकाळ.
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

चिखलठाण : चिखलठाण (जि. सोलापूर) च्या प्राथमिक शाळेतील शिक्षक विवेक पाथ्रुडकर यांच्या गावरान व देशी-विदेशी बियांचा संग्रह करण्याच्या छंदातून त्यांनी सिडबॅंकच साकारली असून ते फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून विविध प्रकारच्या बियांची देवाणघेवाण करत अस्सल देशी बियानांचे संवर्धन करत आहेत. सध्या त्यांच्या ग्रुपच्या बॅंकेत 300 पेक्षा ज्यास्त प्रकारच्या बियांचा संग्रह असून दिवसोंदिवस यामध्ये वाढच होत आहे.

सध्या अनेक गावरान देशी फळे, भाज्या, पिके, फुले आशा विविध वनस्पतींचे वाण दुर्मिळ व नामशेष होण्याच्या मार्गावर आसल्याची ओरड आपणास सर्वत्र ऐकण्यास मिळते. यांच्या संग्रह व संवर्धन करण्याचे फारसे प्रयत्न कोणी करत नाहीत. मात्र चिखलठाण क्रमांक दोन येथील उपक्रमशील शिक्षक विवेक पाथ्रुडकर यांच्या जवळ तब्बल तीनशे अस्सल देशी वाणाच्या बियाणांचा संग्रह आहे. ज्या वनस्पतींना बिया नाहीत त्यांची रोपे तयार केली आहेत. तसेच जेऊर येथील त्यांच्या घराच्या टेरेसवर आशा वनस्पतींची बागही फुलवली आहे. गेल्या तीनचार वर्षांपासून ते आपल्यजवळील बिया व रोपे यांची आपल्या परिचयाच्या व याची आवड आसणारांशी देवाणघेवाण करत होते. प्रमोद तांबे यांच्या फेसबुकवरील 'माती विरहीत बाग' या ग्रुपपासून त्यांना आणखी समविचारी नवीन मित्र मिळाले. यातूनच 5 फेब्रुवारी 2019 रोजी त्यांनी स्वत: व नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील संजय नरोटे, बीड येथील श्रुती ओझा या तीन समविचारी मंडळीनी एकत्र येऊन तिघांच्या नावातील अध्याक्षर घेऊन एस. व्ही. एस सीडबॅंक फेसबुक ग्रुपची व सिडबॅंकेची निर्मिती केली. या ग्रुपचे संपूर्ण देश व परदेशात पाच हजारांच्यावर सभासद आहेत. सध्या या तिघांजवळ विविध प्रकारच्या दुर्मिळ वनस्पतींची बीया उपलब्ध असून राज्याच्या काना कोपऱ्यातील सभासद मंडळींना याची देवाणघेवाण करतात पोष्टाच्या माध्यमातून पाकिटाद्वारे ना नफा ना तोटा या तत्वावर करत आहेत. आजपर्यंत महाराष्ट्रच नव्हे तर तामिळनाडू, मध्यप्रदेश, गुजरात, उत्तरप्रदेश, हरियाणा राज्यात बियांची देवाणघेवाण केली आहे. याशिवाय फिलाडेल्फिया येथून तिथे पिकणाऱ्या लालमका आणि सूर्यफूल आशा बियांची सिडबॅंकेत भर पडली आहे. एखाद्याने फेसबुकवर विशिष्ट प्रकारच्या बियांची मागणी केली असता ते पोस्टाने या बिया पाठवतात. त्याबदल्यात त्यांनाही वेगवेगळ्या ठिकाणची मंडळी त्या परिसरातील गावरान व देशी वनस्पतींच्या बिया पाठवतात. आपली शाळा संभाळून ते राबवत आसलेल्या उपक्रमात त्यांची पत्नी व कुटूंबातील सर्व सदस्य मदत करत आसतात त्यांच्या या देशी वाणांचे बियाणे संवर्धन आगळ्या वेगवेगळ्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

पाथ्रुडकर यांच्याजवळ संग्रही असलेल्या बिया
पालेभाज्या : अंबाडी, पालक, मेथी, शेपू, चुका, चाकवत, पोकळा, लालमाठ, राजगिरा, कोबी, करडई, तांदूळसा, तांबडेपान, कोथिंबीर, कडिपत्ता, मायाळू, फुलकोबी आदी.

फळभाज्या : मिरचीचे 4/5 प्रकार, काकडी, घोसाळी, कर्टुले, डबलबी, मुळा, गाजर, ढेमसे, पावटा, घेवडा, वाल, शेंदाड (चिबूड), खरबूज, कलिंगड, टोमॅटो, पडवळ, अबई, पठाडी, गवार, दोडका, दूधी व काशिफळ भोपळा, कोहळा, डांगर, शेवगा, हादगा, भेंडी, रानभेंडी, कारले, वाटाणा, कारळे, अळसुंदा आदी.

कडधान्ये : चवळी, जवस, हुलगा, काळे तीळ, राजमा, मका, ज्वारी, गहू, उडीद, भगर आदी.
वृक्ष /औषधी झाडे : सीताअशोक, अशोक, करंज, कडूनिंब, रायआवळा, आपटा, शमी, बेल, खैर कवठ, मेंदी, खजूर, बहावा, चिंच, रामफळ, सीताफळ, हनुमान फळ, सरकी, देवकापूस, शिरीष, कांचन, लाल, गुलाबी हादगा, अर्जुन, ऐन, शिवण, गुंज, रीठा, तुळशीचे विविध प्रकार, रतनगुंज, ताम्हण, बिक्‍सा, गुलमोहर, विलायती चिंच, गुळवेल, हिरडा, एरंड, चिकू, पपपई, कोकम, बोर, जांभूळ, काटेसावर, कॉफी, अपामारी, रिंगणी, टिकोमा, बीजा, रोहन, पळस, अंजीर आदी.

फुलझाडे : कमळ, अबोली, पारिजातक, पेंटास, डेझी, लॅव्हेन्डर, आईस्क्रीम क्रीपर, सदाफुली, डेलिया, रेनलिली, मेक्‍सिकन सूर्यफूल, भेंडीगुलाब, दुपारी, वैजयंती, गणेशवेल, सुपारी, मॉर्निंग ग्लोरी, बदकवेल, गुलबक्षी, गोकर्ण, बेसिल, चिनीगुलाब, लसूणवेल, कॉसमॉस, झेंडू, झिनिया, अक्कलकारा, गलांडा, तेरडा, ऍडेनियम, लाजाळू, पॅशनफ्रूट....

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -*  
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 5⃣0⃣2⃣

*शाळेबाहेर जेवणाची वाट पाहणाऱ्या मुलीच्या फोटोने तिचं आयुष्य बदललं*

बोभाटा,November 11, 2019

सोशल मीडियाचा चांगल्या प्रकारे उपयोग केला तर तो किती प्रभावशाली ठरू शकतो, हे वेळोवेळी दिसून आले आहे. बिनकामाचे मेसेजेस फॉरवर्ड करण्यापेक्षा काहीतरी सकारात्मक सोशल मीडियावर शेयर केले तर बदल घडतो याचे एक मोठे उदाहरण आज आम्ही तुमच्या पुढे आणणार आहोत.

हैदराबादच्या एका गरीब मुलीला सोशल मीडियामुळे अशा शाळेत प्रवेश मिळाला आहे, जिथे तिच्या आई वडिलांना प्रवेश घेऊन देणे शक्य झाले नसते.  मध्यंतरी सोशल मीडियावर एक फोटो वायरल झाला. त्या फोटोत एक मुलगी हातात वाडगे घेऊन वर्गातील मुलांचे जेवण संपेल आणि उरलेले आपल्याला मिळेल या आशेने एका वर्गाच्या बाहेर उभी आहे. कुणीतरी हा फोटो घेतला आणि एका स्थानिक पेपर मध्ये तो छापून आला. 'भुकेला चेहरा' असे टायटल देऊन तो फोटो छापण्यात आला होता. हा फोटो गुडीमलकापूर येथील देवल झाम सिंग नावाच्या सरकारी शाळेतील आहे.
त्या मुलीचे नाव दिव्या असे आहे. तिचे आईवडील कचरा गोळा करण्याचे काम करतात. मंडळी आईवडील कामाला गेले की ती शाळेबाहेर उभी राहून थोडं फार खायला मिळेल या आशेने वर्गाबाहेर उभी राहायची. हा तिचा रोजचा दिनक्रम झाला होता.

दिव्याचा हा फोटो लहान मुलांसाठी काम करणारी NGO एमवी फाऊंडेशनचे वेंकट रेड्डी यांच्या नजरेस आला आणि त्यांनी तो फेसबुकवर शेअर केला.  त्यांनी सिस्टीमवर टीका केली आणि एक लहान मुलगी भुकेजून वर्गाबाहेर उभी राहत असेल तर आपल्याला लाज वाटायला हवी असेही लिहिले. फक्त एवढे करून ते थांबले नाहीत त्यांनी त्या शाळेच्या प्रशासनाशी संपर्क साधला आणि तिला तेथे प्रवेश मिळवून दिला.
वेंकट रेड्डींनी नंतर दिव्याचा स्कूल युनिफॉर्म घातलेला फोटो शेअर केला. सोबत तिचे आईवडील सुद्धा दिसत आहेत. रेड्डी स्वतः तिच्या घरी गेले आणि त्यांनी दिव्याची आणि तिच्या आजूबाजूच्या लोकांची परिस्थिती जगापुढे आणली.

मंडळी, एका रात्रीत बदल घडून येत नाहीत आणि फक्त सोशल मिडियावर पोस्टस लिहून तर नाहीच नाही. पण सामाजिक कार्यासाठी उचललेले लहान पाऊलही  समाजात मोठा बदल घडवून आणू शकते, हे दिव्याच्या उदाहरणाने सिद्ध झाले आहे. वेंकट रेड्डी यांच्यासारखे अजून लोक समाजात तयार झाले तर बदल घडायला वेळ लागणार नाही.

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

यापूर्वीचे भाग वाचण्यासाठी आपल्या .....

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 5⃣0⃣1⃣

*निरपेक्ष वृत्तीने ग्राम स्वच्छता करणारे देशिंगचे गोविंदआण्णा क्षिरसागर*

_साभार-दै. पुण्यनगरी ,देशिंग / विठ्ठल हुलवान_

-- घराची कळा अंगण सांगते व गावाची कळा परिसरावरून कळते
अशा आशयाची स्वच्छतेचे महत्व सांगणारी ग्रामीण भागातील एक म्हणं आहे,
त्यामुळे प्रत्येकजण आपापले घर आपला परिसर दररोज झाडून स्वच्छ ठेवत असतो विशेषतः ही जबाबदारी महिला वर्गांवरच असते,
आपलं घर, आपलं अंगण , आपलं व्यवसायाचे ठिकाण व आपला परिसर तर सगळेच स्वच्छ राखतात पण त्याहीपुढे जाऊन सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता करताना मात्र लोकांना कमीपणा वाटतो.
स्वच्छतेचे हेच महत्त्व जाणून माजी ग्रामविकास मंत्री आर आर आबा पाटील यांनी संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून लोकांना एक उपक्रम दिला व तो यशस्वीपणे राबवला, बक्षिसासाठी का असेना? अनेक गावांनी यांमध्ये सहभाग घेतला.
शालेय विद्यार्थीही या मोहिमेत सहभागी झाले होते व फोटोपुरतं का असेना? गावच्या पुढाऱ्यांनी हातात खराटे घेऊन त्यावेळेस गावे स्वच्छ केली होती. कालांतराने ही स्वच्छता मोहीम थंडावली असली तरी सध्या पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून स्वच्छतेवर भर देत स्वतः समुद्रकिनारी स्वच्छता करून लोकांना स्वच्छतेसाठी प्रवृत्त करण्याचा संदेश देत आहेत.
पगार घेऊन स्वच्छता तर सफाई कामगार सुद्धा करतातच, पण आज निरंकारी मिशन सारखी एक अध्यात्मिक विचारधारेचे सेवादल रेल्वे स्टेशन बस स्थानक सार्वजनिक ठिकाणी उत्स्फूर्तपणे स्वच्छता मोहीम राबवत आहेत,
निरपेक्ष वृत्तीने विनामोबदला स्वच्छतेचे काम करणारे हे स्वच्छतादूत खऱ्या अर्थाने गाडगेबाबांचे वारसदार ठरतात,
स्वच्छतेचा हाच वसा
देशिंग येथील श्री गोविंद क्षीरसागर यांनी चालवला आहे, स्वच्छतेचा हा उपक्रम अनेक वर्षापासून अविरत सुरु आहे,
"गोंदाअण्णा" या नावाने ते परिचित आहेत, देशिंगच्या लक्ष्मी चौकात त्यांचे केश कर्तनालय आहे , गेली कित्येक वर्षे त्यांचा हाच पिढीजात व्यवसाय चालू आहे,
अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत त्यांचे ग्राहक आहेत, त्यांच्या या सर्विस सेंटरमध्ये येणाऱ्या प्रत्येकाचं सर्विसिंग करून चकाचक केले जातं, पण ते केवळ व्यक्तीची स्वच्छता करतात असं नाही तर स्वयंप्रेरणेने ते आपल्या परिसराची व रस्त्याची दररोज सकाळ-संध्याकाळ स्वच्छता करत असतात,
त्यांचा हा उपक्रम गेल्या कित्येक वर्षांपासून अखंड चालू आहे,
सकाळी उघडलेलं दुकान दुपारी बंद केल्यानंतर ते झाडू घेऊन आजूबाजूच्या संपूर्ण परिसरातील रस्त्यावर पडलेले कागद, कचरा प्लास्टिक गोळा करून कचरा कुंडीत टाकतात, व संपूर्ण परिसर झाडून चकाचक करतात,
रात्री दुकान बंद झाल्यानंतरही ते संपूर्ण परिसर झाडून लोटून स्वच्छ करतात,
त्यांचा हा उपक्रम मागील अनेक वर्षांपासून चालू आहे.
दररोज पहाटे लवकर उठून ते हरोली येथील हरिपीर दर्ग्याचा परिसर झाडलोट करुन स्वच्छ करतात.
स्वच्छता त्यांच्यामध्ये इतकी भिनली आहे की ते कोणतेही रस्त्यावरुन चालताना वाटेवरील पडलेले दगड-धोंडे प्लास्टिक कचरा उचलून कचराकुंडीत नेऊन टाकत असतात.
हि गोष्ट जरी छोटी असली तरी ती डोंगरा एवढी मोठी आहे.
त्यांचा हा स्वच्छतेचा आदर्श समाजाने घेण्याची आवश्यकता आहे.

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_