twitter
rss

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 5⃣0⃣1⃣

*निरपेक्ष वृत्तीने ग्राम स्वच्छता करणारे देशिंगचे गोविंदआण्णा क्षिरसागर*

_साभार-दै. पुण्यनगरी ,देशिंग / विठ्ठल हुलवान_

-- घराची कळा अंगण सांगते व गावाची कळा परिसरावरून कळते
अशा आशयाची स्वच्छतेचे महत्व सांगणारी ग्रामीण भागातील एक म्हणं आहे,
त्यामुळे प्रत्येकजण आपापले घर आपला परिसर दररोज झाडून स्वच्छ ठेवत असतो विशेषतः ही जबाबदारी महिला वर्गांवरच असते,
आपलं घर, आपलं अंगण , आपलं व्यवसायाचे ठिकाण व आपला परिसर तर सगळेच स्वच्छ राखतात पण त्याहीपुढे जाऊन सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता करताना मात्र लोकांना कमीपणा वाटतो.
स्वच्छतेचे हेच महत्त्व जाणून माजी ग्रामविकास मंत्री आर आर आबा पाटील यांनी संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून लोकांना एक उपक्रम दिला व तो यशस्वीपणे राबवला, बक्षिसासाठी का असेना? अनेक गावांनी यांमध्ये सहभाग घेतला.
शालेय विद्यार्थीही या मोहिमेत सहभागी झाले होते व फोटोपुरतं का असेना? गावच्या पुढाऱ्यांनी हातात खराटे घेऊन त्यावेळेस गावे स्वच्छ केली होती. कालांतराने ही स्वच्छता मोहीम थंडावली असली तरी सध्या पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून स्वच्छतेवर भर देत स्वतः समुद्रकिनारी स्वच्छता करून लोकांना स्वच्छतेसाठी प्रवृत्त करण्याचा संदेश देत आहेत.
पगार घेऊन स्वच्छता तर सफाई कामगार सुद्धा करतातच, पण आज निरंकारी मिशन सारखी एक अध्यात्मिक विचारधारेचे सेवादल रेल्वे स्टेशन बस स्थानक सार्वजनिक ठिकाणी उत्स्फूर्तपणे स्वच्छता मोहीम राबवत आहेत,
निरपेक्ष वृत्तीने विनामोबदला स्वच्छतेचे काम करणारे हे स्वच्छतादूत खऱ्या अर्थाने गाडगेबाबांचे वारसदार ठरतात,
स्वच्छतेचा हाच वसा
देशिंग येथील श्री गोविंद क्षीरसागर यांनी चालवला आहे, स्वच्छतेचा हा उपक्रम अनेक वर्षापासून अविरत सुरु आहे,
"गोंदाअण्णा" या नावाने ते परिचित आहेत, देशिंगच्या लक्ष्मी चौकात त्यांचे केश कर्तनालय आहे , गेली कित्येक वर्षे त्यांचा हाच पिढीजात व्यवसाय चालू आहे,
अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत त्यांचे ग्राहक आहेत, त्यांच्या या सर्विस सेंटरमध्ये येणाऱ्या प्रत्येकाचं सर्विसिंग करून चकाचक केले जातं, पण ते केवळ व्यक्तीची स्वच्छता करतात असं नाही तर स्वयंप्रेरणेने ते आपल्या परिसराची व रस्त्याची दररोज सकाळ-संध्याकाळ स्वच्छता करत असतात,
त्यांचा हा उपक्रम गेल्या कित्येक वर्षांपासून अखंड चालू आहे,
सकाळी उघडलेलं दुकान दुपारी बंद केल्यानंतर ते झाडू घेऊन आजूबाजूच्या संपूर्ण परिसरातील रस्त्यावर पडलेले कागद, कचरा प्लास्टिक गोळा करून कचरा कुंडीत टाकतात, व संपूर्ण परिसर झाडून चकाचक करतात,
रात्री दुकान बंद झाल्यानंतरही ते संपूर्ण परिसर झाडून लोटून स्वच्छ करतात,
त्यांचा हा उपक्रम मागील अनेक वर्षांपासून चालू आहे.
दररोज पहाटे लवकर उठून ते हरोली येथील हरिपीर दर्ग्याचा परिसर झाडलोट करुन स्वच्छ करतात.
स्वच्छता त्यांच्यामध्ये इतकी भिनली आहे की ते कोणतेही रस्त्यावरुन चालताना वाटेवरील पडलेले दगड-धोंडे प्लास्टिक कचरा उचलून कचराकुंडीत नेऊन टाकत असतात.
हि गोष्ट जरी छोटी असली तरी ती डोंगरा एवढी मोठी आहे.
त्यांचा हा स्वच्छतेचा आदर्श समाजाने घेण्याची आवश्यकता आहे.

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_