twitter
rss

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣7⃣2⃣

*🇮🇳 १८ हजार फूट उंचीवर फडकला तिरंगा!*

Published On: Jan 26 2019

*नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन*

देशभरात ७० वा प्रजासत्ताक दिवस उत्‍साहात साजरा करण्‍यात येत आहे. देशभरात उल्‍हासपूर्ण वातावरण आहे. देशाच्‍या सीमेवरील सुरक्षारक्षकांनी देखील प्रजासत्ताक दिन अनाख्‍या पद्धतीने साजरा केला आहे. लडाखमध्‍ये जोश आणि उत्‍साहापूर्ण वातावरणात भारतीय इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिसांच्‍याकडून (आईटीबीपी) मायनस ३० डिग्री तापमान असताना देखील १८हजार फूट उंचीवर देशाचा तिरंगा फडकवून देशाच्‍या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्‍याची कामगिरी केली आहे. त्‍यांच्‍या धाडसाला, शौर्याला सलाम.

या सैनिकांनी जम्‍मू काश्‍मीरमधील लडाखमध्‍ये तिरंगा फडकविला आहे. विशेष म्‍हणजे उणे ३० अंश सेल्सियस (-30 Degree) तापमान असतानाही १८ हजार फूट उंचीवर देशाचा तिरंगा फडकविला आहे. या सैनिकांच्‍या साहसीपणाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. त्‍यांच्‍या धाडसाला सलाम.

इंग्रजाच्‍या जोखडातून भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली भारताची राज्यघटना २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आली. भारतात लोकशाहीचे एक नवे पर्व सुरू झाले म्हणून हा दिवस ‘प्रजासत्ताक दिन’ म्हणून ओळखला जातो. २६ जानेवारी १९३० रोजी लाहोर येथे पार पडलेल्या अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा फडकवून संपूर्ण स्वराज्याची घोषणा केली. म्हणून राज्यघटनेच्या अंमलबजावणीसाठी २६ जानेवारी हा दिवस निश्चित करण्यात आला होता. भारतात पहिला प्रजासत्ताक दिन १९५० साली साजरा करण्यात आला होता.

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_