twitter
rss

┄─┅━━Guruvarya Group ━━┅─┄
*樂♻ गुरुवर्य टिप्स् ♻樂*
_*आधार आणि मोबाईल जोडणी?*_

_ही काय भानगड आहे?_
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार प्रत्येक सिम कार्ड हे आधार नंबरशी जोडणे सक्तीचे आहे.
आपल्यापैकी बहुतेक जणांनी आधार कार्ड घेताना मोबाईल नंबर दिला होता. ते झाले आधार कार्ड साठी OTP यावा म्हणून.
आता जी करायची प्रोसेस आहे तिला म्हणतात eKYC म्हणजे Know Your Customer (electronically).
*ह्यामुळे बोगस नावाने सिम कार्ड घेऊन स्त्रियांना फोनवरून त्रास देणे, खंडणी मागणे, आतंकवादी आणि राष्ट्रविरोधी कारवाया करणे ह्या गोष्टींना मोठ्या प्रमाणात आळा बसेल.*
ही प्रोसेस खालील प्रमाणे आहे आणि आपापल्या मोबाईल कंपनीच्या अधिकृत प्रतिनिधीकडे जाऊनच करायची आहे.
*ही प्रोसेस घरच्या घरी अथवा online शक्य नाही.*
1. आपल्याला मोबाईल कंपनीच्या प्रतिनिधी (जसे की vodafone store, BSNL exchange, IDEA gallery) कडे जाऊन त्यांना आपले आधार कार्ड दाखवायचे आहे
2. मग ते आपल्या मोबाईलवर एक मेसेज पाठवतील तो त्यांना दाखवायचा आहे
3. त्या नंतर आधार कार्ड नंबर टाकून फिंगर प्रिंट व्हेरिफिकेशन केले जाईल
4. 24 तासात आपल्याला आधार जोडणी यशस्वी झाल्याचा मेसेज येईलच.
अंतिम तारीख 6 फेब्रुवारी 2018 आहे.
*घरी अथवा फोन वरून जोडणी शक्य नाही त्यामुळे खोटारड्या लोकांच्या नादी लागू नका.*
हा मेसेज फॉरवर्ड नक्की करा म्हणजे लोकांना वेळेत आधार आणि मोबाईल लिंक करता येईल. कंपन्या स्वतःहून मेसेज पाठवत आहेतच.
आधार आणि मोबाईल नंबर लिंक नसल्यास आपले सिम कार्ड फेब्रुवारी 2018 नंतर बंद करण्यात येईल.
धन्यवाद...
_(वरील बातमी सर्व प्रतिष्ठित वृत्तपत्रांनी आधीच दिली आहे आणि आपणही google करून पडताळून पहावी म्हणजे शंकेला जागा राहणार नाही)_
*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_