twitter
rss

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

🍍🍅 *आरोग्य-MANTRA*  🍋🍉

*भाग* -2⃣7⃣1⃣

*ऋतू बदलतायत, तब्येत सांभाळा..!*

सध्या हिवाळा संपून उन्हाळ्याकडे वाटचाल सुरू आहे. दिवसा खूप उष्ण आणि रात्री काहीसं थंड, असं विषम तापमान आहे. वातावरणात कोरडेपणा आहे. अशा वातावरणात स्वाइन फ्ल्यूच्या विषाणूंची वाढ जोमानं होते. त्याचप्रमाणे सर्दी, खोकला, घसादुखी, सर्वसाधारण फ्ल्यू, घशाचं जिवाणूंमुळे होणारं इन्फेक्शन, डोळे येणं यांसारखे विकार आढळतात. त्याचप्रमाणे एक्झांथेमॅटस फिवर अर्थात पुरळीच्या तापासारखं विकारही आढळतात. साधारणपणे नोव्हेंबर, डिसेंबरपासून सुरू होऊन ते मे, जून महिन्यापर्यंत दिसात. त्यामध्ये गोवर, कांजिण्या, रुबेला हे विकार प्रामुख्यानं दिसतात.
उन्हाळ्याच्या सुरुवातीला दिसू लागणाऱ्या या साथीच्या आजारांपासून स्वतःचा बचाव कसा कराल:
सर्दी, खोकला, फ्ल्यू झाल्यास घरी राहावं. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं.
हातरुमाल सदैव जवळ ठेवा.
ताप, फ्ल्यू किंवा पुरळयुक्त आजार असणाऱ्या व्यक्तींपासून दूर राहा.
उन्हातून घरी आल्यावर एकदम थंड पाणी पिणं टाळा.
गरोदर स्त्रियांनी रुबेला या आजाराची बाधा होऊ नये, याची विशेष काळजी घ्यावी. अन्यथा गर्भास धोका संभवतो.
उन्हाळा वाढू लागला की, भूगर्भातील पाण्याची पातळी खाली जाते आणि त्यात दूषित पाणी मिसळू लागतं. दूषित पाण्यामुळे होणारे विकार वाढू लागतात. यामध्ये विषमज्वर, साथीच्या काविळी, गॅस्ट्रो यांचं प्रमाण वाढतं. उष्माघाताची शक्यता वाढते. या आजारांपासून कसं वाचावं?
तीव्र उन्हाळ्यात स्वतःबरोबर स्वच्छ पिण्याचं पाणी बाळगावं. रस्त्यावर दिसणाऱ्या गोष्टी, उदा. लिंबू सोडा, फ्रुट प्लेट, उघड्यावरची फळं टाळावी.
उसाचा रस, नीरा हे गुणकारी आहेत. त्यामध्ये दूषित बर्फ घालून पिणं टाळा.
विषमज्वर आणि हिपेटायटिस 'ए' या आजारांवर लस उपलब्ध आहे. ती डॉक्टरी सल्ल्यानं घ्यावी.
उन्हाळ्यानंतर येतो पावसाळा. पावसाळा आला की, वातावरण थंडगार, आल्हाददायक होतं. त्याबरोबर अतिसार, पटकी, अन्नातून विषबाधा, विषाणूजन्य काविळ, लेप्टोस्पायरोसिस आणि हिवताप यांची लागण वाढते. या काळात शुद्ध पाणी प्यावं. साठलेल्या पाण्यातून चालणं टाळावं. उघड्यावर मल वित्सर्जन केल्यामुळे साथीचे आजार बळावतात. त्यामुळे ही अनारोग्यकारी सवय ताबडतोब सोडावी.
हिवाळा हा आरोग्यपूर्ण ऋतू आहे. पण यावेळी फुप्फुसांचा जंतूसंसर्ग, दम्याचा विकार बळावणं, फ्ल्यू आणि डेंगीचे रुग्ण वाढतात. २०१५-१६साली डेंगी आणि चिकुनगुनियाचे सर्वाधिक रुग्ण नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये नोंदले गेले. अशा प्रकारे ऋतूचक्राप्रमाणे साथीच्या आजारांचं चक्रही एक वर्ष गोल फिरून पुन्हा त्याच ठिकाणी आलं.

🍍🍎🍅🍇🍉🍋🍎🍍

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

यापूर्वीचे भाग वाचण्यासाठी.....

http://guruvarykm.blogspot.in/

या आपल्या Blog ला भेट द्या  .