twitter
rss

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

🍍🍅 *आरोग्य-MANTRA*  🍋🍉

*भाग* -2⃣7⃣2⃣

*अर्धशिशीचा त्रास*

✒डॉ. संताजी कदम, फिजिशियन

अर्धशिशी या विकाराची लक्षणं अत्यंत वैशिष्टपूर्ण असतात. विशेषत: यातही दोन प्रकारचे रुग्ण दिसून येतात.
अर्धशिशी या विकाराची लक्षणं अत्यंत वैशिष्टपूर्ण असतात. विशेषत: यातही दोन प्रकारचे रुग्ण दिसून येतात. यातील काही रुग्णांना अर्धशिशीचा त्रास सुरू होण्यापूर्वी शरीराकडूनच त्रास सुरू होण्याची पूर्वसूचना मिळते आणि काही वेळातच अर्धशिशीचा त्रास सुरू होतो. याला मायग्रेन विथ ऑरा असं म्हणतात. काही रुग्णांना शरीराकडून कोणतीही पूर्वसूचना न मिळता अचानक त्रास सुरू होतो. याला मायग्रेन विदआउट ऑरा असं म्हणतात. दुसऱ्या प्रकारच्या अर्धशिशीचं प्रमाण सर्वांत जास्त आढळतं. बऱ्याच वेळा अर्धशिशीचा संबंध गर्भावस्था, मासिक पाळीशी देखील आढळून येतो. या कालावधीमध्ये हा त्रास सुरू होऊ शकतो किंवा पूर्णपणे बंद देखील होतो. पूर्वसूचनेसह येणारी अर्धशिशी या प्रकारात दुखणं सुरू होण्यापूर्वी पुढील लक्षणं दिसून येतात.

*अर्धशिशीची लक्षणं*

डोळ्यापुढे तारे चमकल्यासारखं वाटतं. विशेषत: ज्या बाजूचं डोकं दुखतं त्या बाजूला असं वाटतं. याला स्किटिलेटिंग स्कोटोमा असं म्हणतात. यामध्ये दिसणारं दृश्य हे मध्यभागी गडद असतं आणि बाजूला खूप प्रकाशमान दिसतं. डोक्याचा मागील भाग जड होते, मानेचे स्नायू ताठ होतात, चेहरा, हातातून मुंग्या येणं, विचित्र वास येणं, वास सहन न होणं, अस्वस्थतता, मानसिक चिडचिड वाढणं, नैराश्य, बोलताना जीभ अडखळणं, झोप न येणं, गरगरणं, अंधारी येणं, विशिष्ट पदार्थ खाण्याची इच्छा होणं, आदी लक्षणं आढळून येतात.

अर्धशिशीच्या बऱ्याच रुग्णांमध्ये सूर्योदयानंतर काही वेळानं डोकेदुखीस सुरुवात होते. दुपारपर्यंत दुखण्याची तीव्रता प्रचंड वाढते. घाव घातल्यासारखं डोकं दुखतं. रुग्णाला डोकं गच्च बांधून ठेवावंसं वाटतं. संध्याकाळच्या सुमाराला दुखण्याचं प्रमाण कमी होतं. या सर्व लक्षणांबरोबरच अर्धशिशीमध्ये उलटी, मळमळ, चक्कर येणं, ताप येणं ही लक्षणंदेखील आढळून येतात. अर्धशिशीचा आलेला झटका हा कमीत-कमी २ तास ते ७२ तासांपर्यंत राहू शकतो. अर्धशिशीवर वेळीच उपचार न घेतल्यास जीवावरही बेतू शकतं. वेळेवर सल्ला आणि उपचार घेतल्यास या विकारातून मुक्त होता येतं.

अर्धशिशी या विकारावर विविध वैद्यकीय शास्त्रांच्या माध्यमातून सर्वोत्तम औषधोपचार उपलब्ध आहेत. केवळ औषधोपचार हा या विकारापासून मुक्तीचा मार्ग नसून, इतरही कारणीभूत ठरणाऱ्या अनेक बाबींचं व्यवस्थापन या रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वाचं ठरतं. वंशपरंपरेनं येणारी अर्धशिशी हे कारण सोडलं, तर इतर कारणं ही खऱ्या अर्थानं मानवनिर्मित कारणं आहेत. एकविसाव्या शतकातील या धावपळीच्या युगामध्ये मानसिक ताणतणाव हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील एक अविभाज्य घटक बनला आहे. अगदी पाळणाघराच्या वयापासून सुरू झालेला हा ताण अगदी शेवटपर्यंत आपली पाठ सोडत नाही. बालपणीच्या खेळण्याच्या या वयामध्ये अनेक गोष्टी नाईलाजास्तव लादल्या जातात.

आर्थिक गणित जुळवताना पालकांची होणारी दमछाक आणि त्यामुळे मुलांना पुरेसा वेळ देता न येणं, त्यातूनच होणारी भावनांची मुस्कटदाबी, खेळण्याच्या वयात अभ्यासाचा पडणारा अवास्तव ताण, पालकांच्या अपेक्षांचं ओझं, खेळाचा अभाव अशा अनेक कारणांमुळे कोवळ्या वयामध्ये मेंदूवर ताण पडतो आणि अर्धशिशीस पोषक वातावरण तयार होतं. यातच आणखी भर पडली आहे ती तंत्रज्ञानाची. तासनतास मोबाइल, व्हिडिओ गेम खेळणारी, टीव्ही पाहणारी मुलं यांमुळे मुलांची शारीरिक क्षमता कमी होऊन मेंदूवर पडणारा अतिरिक्त ताण अर्धशिशीला आमंत्रण देत आहे. अर्धशिशीपासून आपल्या मुलांचं रक्षण करण्यासाठी वरील कारणं टाळावीत आणि परिवारामध्ये एकमेकांशी संवाद साधून सातत्यानं आनंदी, मोकळं वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करावा. या सर्वांचे बालमनावर होणारे परिणाम अत्यंत घातक असून अर्धशिशी या विकारावर उपचार करताना वरील सर्व बाबींचं व्यवस्था करणं महत्त्वाचं
ठरतं.

🍍🍎🍅🍇🍉🍋🍎🍍

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_